AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, शिवसेना महिला आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी

पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, शिवसेना महिला आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी
| Updated on: Oct 07, 2020 | 8:34 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस दलात सुमारे 2 लाख 22 हजार पोलीस आहेत. त्यामध्ये केवळ 29 हजार महिला पोलिस आहेत. खरं तर 33 % आरक्षण गृहीत धरले तर सुमारे 70 हजाराच्यावर महिला पोलीस असणे आवश्यक आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. (Recruit 33 percent women police in the police force Demand Shivsena MLA Manisha Kayande)

महिलांवर होणारे अत्याचार तसेच महिलांचे इतर प्रलंबित प्रश्न घेऊन काल सह्याद्री अतिथिगृह येथे महिला सुरक्षितता आणि दिशा कायदा यासंबंधी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गृहमंत्री अनिल देशमुख तसेच गृहराज्य मंत्री सतेज पाटील व शंभूराजे देसाई यांना भेटलं.

आमदार कायंदे यांच्या निवेदनावर गृहमंत्री देशमुख म्हणाले, नवीन 12 हजार पोलिसांची भरती होणार आहे यामध्ये महिलांची संख्या 33 टक्के होईलच याची आम्ही काळजी घेऊ व इतर मागण्यांवर आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करू”

सामान्य महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते त्यावेळेस तेथे तक्रार नोंदवण्यासाठी महिला पोलीस असणे व्यथा मांडण्यासाठी अधिक सोयीस्कर होते. पुरुष अधिकाऱ्यांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडणे खूप कठीण जातं आणि महिला आणि पुरुष यामधील संवेदनशीलता पाहिली तर निश्चितच महिलांमध्ये संवेदनशीलता अधिक असते हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे पोलिस दलात अधिकाधिक महिला असणं आवश्यक आहे, असं कायंदे म्हणाल्या.

महिला पोलिसांच्या सोयीसुविधा त्यांच्या कामाच्या वेळा व त्यांच्यासाठी असलेले शौचालय याचीदेखील कमतरता आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो. पोलिसांसाठी फिरती शौचालय असण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सुमारे आठ ते दहा महिन्यापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. हे तातडीने भरण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी गृहमंत्र्यांकडे केले.

तसेच विभागीय स्तरावर महिला आयोग कार्यालय असणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून महिलांना तिथे आपली व्यथा मांडणे अधिक सोयीस्कर होईल आणि असा निर्णय देखील सरकारचा झालेला आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. महिला पोलिसांना समुपदेशन करण्याच्या पद्धती किंवा समुपदेशन कसे करावे याबाबत विशेष ट्रेनिंग देण्याची गरज आहे, असेही कायंदे यांनी म्हटले. (Recruit 33 percent women police in the police force Demand Shivsena MLA Manisha Kayande)

संबंधित बातम्या

दानवे म्हणाले, हे सरकार अमर अकबर अँथोनीचं, गृहमंत्र्यांचंही शायराना अंदाजात प्रत्युत्तर

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? :अनिल देशमुख

सुशांतप्रकरण भाजपकडून हाइप; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.