AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील निर्बंध आणखी शिथील, रात्रीची संचारबंदी हटवली, नवे नियम काय?

मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील निर्बंध आणखी शिथील, रात्रीची संचारबंदी हटवली, नवे नियम काय?
मुंबईतल्या कोरोना नियमात शिथिलता
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 7:24 PM
Share

मुंबई : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या अटोक्यात आल्याने मुंबईतील निर्बंध आणखी शिथील करण्यात येत आहे. मुंबईत काल केवळ एक हजार रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील रात्रीची संचारबंदी (Night Curfew) हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईत आजपासून सुधारीत नवी नियमावली (New Rules In Mumbai) जाहीर झाली आहे. तर मुंबईतली सर्व पर्यटन स्थळही खुली होणार असल्यची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी गूड न्यूज आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरूवातीलचा ओमिक्रॉनने मुंबईची चिंता चांगलीच वाढवली होती. कारण एकट्या मुंबईतील रुग्णसंख्या ही पंचवीस हजारांच्या जवळ जाऊन पोहोचली होती. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या सतत नियंत्रणात येत आहे. सोमवारी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली गेल्याने प्रशासनाने आवळलेले निर्बंध आता पुन्हा शिथिल करण्यास सुरूवात केली आहे.

असे असतील नवे नियम

  1. मुंबईत रात्रीची संचारबंदी उठवली
  2. मुंबईतली सर्व पर्यटनस्थळं सुरु होणार
  3. स्पा आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
  4. अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नसेल
  5. चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार
  6. स्विमिंग पूल, वॉटरपार्क 50 टक्के मर्यादेने सुरू
  7. रेस्टॉरंट, थेटर्स, नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेने सुरू
  8. धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी
  9. लग्नासाठी 25 टक्के उपस्थितीची मर्यादा
  10. खेळाच्या मैदानात 25 टक्के उपस्थितीची मर्यादा

देशासह जग गेल्या जवळपास अडीच वर्षापासून कधी कडक लॉकडाऊनमध्ये तर कधी निर्बंधात दिवस काढत आहे. कोरोनाने जगाला हैराण करून सोडले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची दाहकता अजूनही दिसून दिसून येते. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतलं मृत्युतांडव आणि रुग्णांचे हाल आपण सर्वांनी पाहिले आहेत. दुसरी लाट संपल्यानंतर थोडासा दिलास मिळाला होता. उद्योगधंदे पुन्हा सुरू होत होते. मात्र तेवढ्यात कोरोनाची तिसरी लाट आली, आणि पुन्हा जगाला धडकी भरवली. पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार उभी राहिली. त्यामुळे अनेकांच्या मनात उद्योगधंदे पुन्हा बुडण्याची भिती होती, त्यातच तिसऱ्या लाटेबरोबर ऑमिक्रॉन व्हेरिएंटच्या येण्याने हा दुष्काळात तेरावा वाटू लागला. मात्र प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे आणि लोकांच्या सतर्कतेमुळे रुग्ण पुन्हा अटोक्यात येत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच लसीकरणही यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध शिथील होत आहेत.

Hindusthani Bhau : हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचे आवाहन, ऑडिओ क्लिप व्हायरल

Breaking : ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी, अजितदादांची माहिती; आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप-शिवसेना नेते आमनेसामने

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.