AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ते मला न्याय देतील…

मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले, मला फक्त एवढं म्हणायचं आहे की, मला केंद्र शासन, न्यायपालिका आणि एनसीबीवर पूर्ण विश्वास आहे

मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ते मला न्याय देतील...
sameer wankhedeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2023 | 6:07 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, मुंबई : समीर वानखेडे यांना २४ मेपर्यंत कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलंय. समीर वानखेडे यांना हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांनी रीट पिटीशन दाखल केली होती. २२ मेपर्यंत त्यांना कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलंय. वानखेडे यांना २२ मेपर्यंत अटक नको, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी सीबीआय अटकेच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. कोर्टानं वानखेडे यांना तात्पुरते संरक्षण दिले आहे. सीबीआयच्या चौकशीला समीर वानखेडे हे सामोरे जातील. सोमवारी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होईल. या सगळ्या प्रकरणात काय अपडेट येतात, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास

मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले, मला फक्त एवढं म्हणायचं आहे की, मला केंद्र शासन, न्यायपालिका आणि एनसीबीवर पूर्ण विश्वास आहे. मला ते न्याय देतील. मागच्या वर्षांपासून जो त्रास सुरु होता, आता त्याचं निवारण होणार आहे.

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी रीच पिटीशन दाखल केली होती. समीर वानखेडे यांनी तपासात सहकार्य करावे, असे म्हटले. समीर वानखेडे यांनी तपासात सहकार्य केले नाही, असा आरोपी सीबीआयने केला होता.

२५ कोटी रुपये खंडणीचे आरोप

समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटी रुपयांच्या खंडणीचे आरोप केले जात आहेत, असा मोठा दावा वकील रिझवान मर्चंट यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई कोर्टात रिट याचिका दाखल केलेली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आणि कोर्टाने 22 मेपर्यंत वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिलं.

शाहरुख खान एक बाप म्हणून विनंती करत होता. त्यामध्ये पैशांसंबंधी काहीच संभाषण झालेलं दिसत नाहीय. तसं असतं तर ते संभाषणात दिसलं असतं. ज्ञानेश्वर सिंह आणि समीर वानखेडे दोघांबरोबर शाहरुख खानचे चॅट आहेत. मागे याचिकेत त्यांनी अधिकाऱ्यांनी पैसे मागितले नाही, असे नमूद केले होते. चॅटमध्ये शाहरुख खान वानखेडे यांना प्रामाणिक अधिकारी म्हणत आहेत.

Follow Us
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.