AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूतकाळ पाहू नका…भविष्याचा विचार करण्याचे संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना संदेश

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करण्यापूर्वी एकमेकांवर प्रचंड टीका करत होतो. परंतु आम्हाला एकत्र यायचे होते, तेव्हा आम्ही भूतकाळ पाहिला नाही. जेव्हा राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी हातमिळवणी करतो तेव्हा भूतकाळ कशासाठी पाहावे.

भूतकाळ पाहू नका...भविष्याचा विचार करण्याचे संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना संदेश
संजय राऊत
| Updated on: Apr 21, 2025 | 10:35 AM
Share

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरुन राज्यात राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याबाबत शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा भूमिका मांडली. तसेच भूतकाळात काय झाले ते पाहू नका, भविष्याचा विचार करा. महाराष्ट्राचा विचार करा, असा संदेश त्यांनी राज ठाकरे यांना दिला.

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत संजय राऊत म्हणाले, दोन प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याबाबत भूमिका मांडल्या आहेत. त्यानंतर काही लोकांना वेदना होणार आहे. त्यांच्या पोटात मळमळ होत असले, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. कारण त्या लोकांना कायमचे शेतात जावे लागले. संघाच्या शाखेत जावे लागले, अशी भीती त्या लोकांना आहे.

मनसेकडून शिवसेनाचा जुना इतिहास सांगितला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करण्यापूर्वी एकमेकांवर प्रचंड टीका करत होतो. परंतु आम्हाला एकत्र यायचे होते, तेव्हा आम्ही भूतकाळ पाहिला नाही. जेव्हा राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी हातमिळवणी करतो तेव्हा भूतकाळ कशासाठी पाहावे. आम्हाला महाराष्ट्राचे भवितव्य घडावायचे आहे, हे दोन नेत्यांमध्ये ठरले आहे. आमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.

संजय राऊत यांनी मनसेमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांना फटकारले. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी स्वत: या विषयावर मत व्यक्त केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केल्यावर इतरांनी त्यात बोट घालण्याची गरज नाही. राज ठाकरे यांच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय एकत्र काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली नसती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही ही भूमिका मांडली. आमच्या पक्ष प्रमुखांकडूनही संदेश दिला गेला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी फक्त संकेत दिल्यावर राज्यात इतकी आग लागली आहे. जर ते एकत्र आले तर काय होईल? असे राऊत यांनी म्हटले.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.