AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मायुसी का?; संजय राऊत म्हणाले जाहीर सांगता येणार नाही

संभाजीनगरमध्ये राडा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या राड्यावरून शिंदे गटावर मोठा आरोप केला आहे. या राड्यामागे शिंदे गट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मायुसी का?; संजय राऊत म्हणाले जाहीर सांगता येणार नाही
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2023 | 12:18 PM
Share

मुंबई : संभाजीनगरच्या किराडपुरा भागात काल रात्री तुफान राडा झाला. दोन गटात झालेल्या हाणामारी आणि जाळपोळीत प्रचंड नुकसान झालं आहे. जमावाने पोलिसांच्या गाड्याही पेटवून दिल्या. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळापासून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संभाजी नगरातील राडा संपला असला तरी आता राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर संभाजीनगरच्या दंगलीमागे डुप्लिकेट शिवसेना असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊत यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मायुसी का? असा सवाल राऊत यांनी केला.

औरंगाबादेत तणावर निर्माण केला जात आहे. या मागे कोण आहे हे गृहमंत्र्यांना कळायला हवं. हे शिवसेना करत नाहीये. हे डुप्लिकेट शिवसेना करत आहे. या सरकारचा हेतू आहे राज्यात अशांतता निर्माण व्हावी असाच आहे. दंगली व्हाव्यात असा या सरकारचा हेतू आहे. गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे, असं सांगतानाच संभाजीनगरला जे झालं, ते सरकारचं अपयश आहे. राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी, तणाव कायम राहावा म्हणून मिंधे गट काम करतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

फडणवीसांना नैराश्य

सध्या जे फडणवीस दिसत आहेत ते पूर्वीसारखे फडणवीस नाहीत. फडणवीस निराश झाले आहेत. वैफल्यग्रस्त होऊन काम करत आहेत. त्यामागची कारणं शोधावी लागतील. जाहीर सांगता येणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर मायुसी का आहे? असा सवाल राऊत यांनी केला.

सरकारचं अस्तित्व नाही

राज्यातील मंत्री मंत्रालयात भेटत नाहीत. बाहेर सरकारचं अस्तित्व नाही. म्हणून तर कोर्टाला या सरकारला नपुंसक आणि अस्तित्वहीन सरकार म्हणावं लागलं आहे. या सरकारचा जीव खोके आणि पेट्यात आहे. ज्या सरकारचा जीव खोक्यात आणि पेट्यात असतो त्याला नपुसंक म्हणतात. कोर्टाने बरोबर तोच मुद्दा उचलाल. सत्यमेव जयते यालाच म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला आहे.

पुढची सभा पाचोऱ्यात

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरही भाष्य केलं. राज्यात महाविकास आघाडीच्या सभा दणक्यात होतील. मराठवाड्यातील सभा प्रचंड मोठी होईल. पुढची सभा पाचोऱ्यात होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हातोडा मारण्याचं काम आम्ही केलं

अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपुरातील सागवान लाकूड नेण्यात येणार आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचं योगदान अयोध्येच्या लढ्यात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान म्हणजे महाराष्ट्राचं योगदान आहे. तुम्ही लाकूड नेता चांगलं आहे. हातोडे मारण्याचं काम आम्हीच केलंस असंही त्यांनी सांगितलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.