Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अमोल कीर्तिकर विजयी होणार…संजय राऊत नेमके काय म्हणाले?

केंद्रातील सरकारही लवकरच बदलणार आहे. मग वंदना सूर्यवंशी कुठे जाणार आहे. या ठिकाणी अमोल कीर्तिकर विजय होणार आहे. आम्ही न्यायालयात जाणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अमोल कीर्तिकर विजयी होणार...संजय राऊत नेमके काय म्हणाले?
sanjay raut
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 11:26 AM

मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना सूर्यवंशी यांनी काम पाहिले. त्या सर्वात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. त्यांनी मतमोजणी दरम्यान अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बंद केले. आता ते सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. त्यांनी अमोल कीर्तिकर यांच्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबाबात घेतला आहे. त्या ठिकाणी रवींद्र वायकर यांचे लोक मोबाईल घेऊन फिरत होते. परंतु आता चार महिन्यांत सरकार बदलणार आहे. केंद्रातील सरकारही लवकरच बदलणार आहे. मग वंदना सूर्यवंशी कुठे जाणार आहे. या ठिकाणी अमोल कीर्तिकर विजय होणार आहे. आम्ही न्यायालयात जाणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजप संघाला संपवणार

अहंकाराचे सर्व मर्यादा मोदी आणि शहा यांनी सोडली आहे. त्यामुळे आता भाजपामध्ये जे आरएसएसची लोक बसलेली आहेत ते मोदींविरोधात बंड पुकारणार आहे. देशात दोन तानाशहा (नरेंद्र मोदी, अमित शाह) राज्य करत आहेत. आरएसएसने हे देखील सांगितले होते की भाजप आणि शिवसेनेची युती तुटू देऊ नका. परंतु त्यांचे ऐकले गेले नाही. आरएसएसने एक नैतिक ताकद भाजपाला दिली आहे. परंतु भाजपाने आता आरएसएसला संपवण्याचा ठरवलं आहे.

मोहन भागवत कुठे गेले

मोहन भागवत कुठे काश्मीर अन् मणिपूरमध्ये गेले. मोहन भागवत यांनी मणिपूर आणि काश्मीरमध्ये जावे. आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. फक्त बोलून काय होणार? तुम्ही नेतृत्व करा आम्ही येऊ तुमच्या सोबत.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.