AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येऊ देणार नाही म्हणजे काय?; संजय राऊत यांचा नारायण राणे यांना सवाल आणि आव्हान

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना थेट आव्हानच दिलं आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांना रोखून दाखवाच, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

येऊ देणार नाही म्हणजे काय?; संजय राऊत यांचा नारायण राणे यांना सवाल आणि आव्हान
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 06, 2023 | 10:23 AM
Share

मुंबई : उद्धव ठाकरे यांना बारसूत येऊ देणार नाही. असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. राणे यांच्या या इशाऱ्याची ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. येऊ देणार नाही म्हणजे काय? म्हणजे काय? तुमच्या या पोकळ धमक्या बंद करा, असं सांगतानाच उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी बारसूत उतरतील. त्यांना रोखून तर दाखवाच, असं प्रती आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे बारसूत सभा घेणारच नव्हते. सभा उद्या महाडला होती. पण बारसूत अत्याचार सुरू आहेत. त्यामुळे ते बारसूला आले आहेत. लोकांशी चर्चा करणार आहेत. येऊ देणार नाही म्हणजे काय? अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे. ठाकरे कुटुंब आणि कोकणचं नातं आहे. शिवसेना आणि कोकणचं नातं आहे. जेव्हा जेव्हा कोकणावर आघात झाला. तेव्हा शिवसेना धावून गेली. शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही. पुन्हा रिपीट करतो. शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही, असं संजय राऊत म्हणाले.

रोखून तर दाखवा

शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत आहे. भांडवलदारांचे दलाल धमक्या देत आहेत. आता उद्धव ठाकरे बारसूत उतरतील. काय येऊ देणार नाही? या पोकळ धमक्या देणं बंद करा. या देशात लोकशाही आहे. राज्यात लोकशाही आहे. आंदोलक जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. कुणाच्या जमिनी हिसकावून घेत नाहीत. माझी जमीन वाचवण्याचा मला अधिकार आहे. जमीन माझी आहे. आम्ही चोर नाही. दहशतवादी नाही. दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नका. आम्ही आमच्या जमिनी वाचवू. त्यासाठी आंदोलन करू, असा इशाराच राऊत यांनी दिला. शिवसेनेला रोखणारा अजून कोणी जन्माला आला नाही. आम्हाला कोणी रोखू शकत नाही ते उद्धव ठाकरे यांना कोण रोखणार. इथे बसून बाता काय मारता. रोखून तर दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

निर्णय देशाच्या हिताचा

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. शरद पवारांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याला शक्तीप्रदर्शन म्हणणं मला योग्य वाटत नाही. तो एक स्वतंत्र पक्ष आहे. एक फार मोठी पिढी पवारांसोबत काम करत आहे. पवारांच्या या निर्णयाने त्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. राजीनामा देणं हा त्यांचा भावनिक निर्णय होता. त्यांनी निर्णय मागे घेतला त्याचा आनंद आहे. पवारांचं नेतृत्व असलं पाहिजे. काल मी त्यांना भेटून सांगितलं. पवारांनी राजीनामा मागे घेतला हे देशाच्या राजकारणासाठी योग्य झालं, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.