AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, राऊतांची सकाळी सकाळी फटकेबाजी

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. देशातील विरोधी पक्ष एकत्रित यावेत म्हणून हालचाली ठरत आहेत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे काम पुढे जाऊ शकत नाही. शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय नाही.

Sanjay Raut : कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, राऊतांची सकाळी सकाळी फटकेबाजी
संजय राऊत, खासदार, शिवसेना.
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 10:11 AM
Share

नवी दिल्लीः कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई (Mumbai) महापालिका निवडणूक जिंकू, असा थेट इशारा शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला देताना आज सकाळी सकाळीच जोरदार फटकेबाजी केली. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना, भाजप आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झालीय. एकीकडे भाजपने आमच्या मागे ईडी लावली, असा आरोप शिवसेनेतून स्वतः राऊतांपासून अनेक नेत्यांनी केलाय. तर दुसरीकडे भाजप नेते तुमच्या कारनाम्यामुळे तुम्ही गोत्यात येताय, असा दावा करतायत. ही सारी सुंदोपसुंदी देशातील एका राज्याएवढे मोठे बजेट असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी आहे. आता ही पालिका आमच्याविरोधात कट कारस्थाने करणाऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून जिंकू, असा दावा राऊत यांनी केलाय. आता भाजपकडून यावर कोण काय उत्तर देणार याची उत्सुकताय.

काय म्हणाले राऊत?

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही कितीही कारनामे करा. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र येऊ द्यात. आम्ही मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली उतरू देणार नाही. ही निवडणूक जिंकूच असा इशारा त्यांनी दिला. शिवाय ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीने लढूल आणि जिंकू असा दावाही त्यांनी केला. कोल्हापूर उत्तरमध्येच कशाला, तर गोव्यात, पाच राज्यांत, पणजी आणि साखळी मतदारसंघात ईडी लावा. मात्र, अनेक गाठीभेटी होत असतात. आमच्याकडे अनेक लोक येतात. अशा भेटींविषयी फार बोलण्याची गरज नाही.

पाटलांनी पुढाकार घ्यावा…

संजय राऊत पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला असला, तरी ईडी लावणे गरजेचे आहे. गोव्यातले पणजी मतदारसंघ आणि साखळी या दोन्ही मतदारसंघातील मतदारांची ईडी चौकशी लावली तर त्याचेही स्वागत करू. महाराष्ट्रात नंतर बघू. सुरुवात पाच राज्यांतून करावी. चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतला, तर खांद्याला खांदा लावून काम करू, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

पवारांशिवाय पर्याय नाही

संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. देशातील विरोधी पक्ष एकत्रित यावेत म्हणून हालचाली ठरत आहेत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे काम पुढे जाऊ शकत नाही. शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय नाही. त्यांच्याशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.