AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमधील लोकांचे मेंदू किड्यामुंग्यांचे; संजय राऊत यांची जहरी टीका कुणावर?

महाराष्ट्र कधी निर्माण झाला? मध्यप्रदेश कधी निर्माण झाला? बिहार कधी निर्माण झालं? त्यांना कळतं का? अभ्यास त्यांनी करायचा आहे. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा देशात एकही राज्य नव्हतं.

भाजपमधील लोकांचे मेंदू किड्यामुंग्यांचे; संजय राऊत यांची जहरी टीका कुणावर?
भाजपमधील लोकांचे मेंदू किड्यामुंग्यांचे; संजय राऊत यांची जहरी टीका कुणावर?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 16, 2022 | 10:58 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्यप्रदेशातील महू येथे झाला. इतके सामान्य ज्ञान असू नये. महापुरुषांबद्दल चुकीची माहिती तुम्ही देता. महापुरुषांचा अवमान करता अन् मोर्चे काढता? असा संतप्त सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना केला होता. चित्रा वाघ यांच्या या विधानाचा राऊत यांनी समाचार घेतला आहे. बाबासाहेबांचा जन्म झाला. तेव्हा भाषिक राज्यांची निर्मिती झाली नव्हती. तेव्हा फक्त मुंबई प्रांत होता. त्यामुळेच बाबासाहेब हे महाराष्ट्राचे सुपूत्र ठरत नाहीत का? असा सवाल करतानाच भाजपच्या नेत्यांचा मेंदू किड्यामुंग्यांचा झाला आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केली.

माझं विधान काय आहे? त्यात अपमान काय आहे? काही भाजपच्या लोकांचे मेंदू किड्यामुंग्याचे आहेत. दुर्देवाने असं म्हणावे वाटते. घटनाकार बाबासाहेबर आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्रं नाहीत का? त्यांचा जन्म या देशातच झाला. बाबासाहेबांचा जन्म 1891मध्ये महू येथे झाला होता. महू सध्या मध्यप्रदेशात आहे. तेव्हा मध्यप्रदेशात नव्हतं. भाषिक राज्य कधी निर्माण झाली याचा अभ्यास करा, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी चित्रा वाघ यांना दिलं.

महाराष्ट्र कधी निर्माण झाला? मध्यप्रदेश कधी निर्माण झाला? बिहार कधी निर्माण झालं? त्यांना कळतं का? अभ्यास त्यांनी करायचा आहे. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा देशात एकही राज्य नव्हतं. एकच मुंबई प्रांत होता. बाबासाहेब महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. हे त्यांना माहीत नसेल, कळत नसेल तर त्यांच्या अजूनही बाबासाहेबांविषयींच्या भावना काय आहेत हे दिसून येते, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपमध्ये बाहेरून काय लायकीचे आणि बुद्धीचे लोकं घेतली हे या लोकांच्या विधानावरून कळतंय. त्यांच्या जीभेवर काय, डोक्यात काय, पोटात काय… हे लोक वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत. बाबासाहेब देशात जन्मले ते देशाचं भाग्य आहे. त्यांना वाटत नसेल तर ते त्यांचं दुर्भाग्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी महामोर्चाच्या परवानगीवरून सरकारवर टीका केली. सरकार निर्लज्ज आहे. सत्ताधारी पक्षाला आमच्या महापुरुषांविषयी श्रद्धा नसेल तर हे सरकार लाचार आहे. शिवाजी महाराजांचा अवमान झाला तरी सरकार गप्प आहे.

बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अपमानानंतरही सरकार गप्प आहे. उगाच गांडुळासारखी जीभ वळवळ करत आहे म्हणून हा मोर्चा आहे. ही पोटदुखी आहे त्यांची, असा घणाघात त्यांनी चढवला.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.