AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : शिंदे – फडणवीसांच्या हातात जास्त काही नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले अजित पवार?

अधिवेशन आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यावरुन शिंदे- फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांना नियमांपेक्षा जास्त मदत देण्याची गरज असल्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Ajit Pawar : शिंदे - फडणवीसांच्या हातात जास्त काही नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले अजित पवार?
मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका Image Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jul 25, 2022 | 5:03 PM
Share

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis)हातात मंत्रिमंडळाचे फारसे काही दिसत नसून, दिल्लीतून जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत हे काही करु शकत नाहीत, असे दिसत असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील अतिवृष्टी, कारभार यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्यात अतिवृष्टीची स्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहेत, अशा स्थितीत सरकारने तातडीने यावर उपाययोजना करायला हव्यात. तातडीने अधिवेशन बोलावण्याची गरज आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. बहुमताचं सरकार असतानाही राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशा स्थितीत राज्य सरकारचा कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, हा राज्याचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली आहे. अधिवेशन आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यावरुन शिंदे- फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांना नियमांपेक्षा जास्त मदत देण्याची गरज असल्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

शिंदे फडणवीसांच्या हातात फारसं काही नाही

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत, त्यात गैर काही नाही, मात्र राज्याचे प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पुरासारख्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री यांचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. अशा स्थितीत मात्र इतरांना त्रास देऊ नये म्हणून शिंदे फडणवीस हे दोघेच सरकार चालवत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या हातात फारसे काही दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत जाऊन जोपर्यंत तिथून हिरवा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत हे काही करु शकत नाही असे दिसत असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

मविआ सरकारच्या कामांना स्थगिती का?

शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने गेल्या सरकारच्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे, यावर अजित पवार यांनी टीका केली आहे. दे दोघे काही सत्तेचा ताम्रपट घेून जन्माला आले आहेत का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे कामही थांबवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे योग्य नसल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड