AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वाद मिटला, गजानन कीर्तिकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा’, रामदास कदम यांची प्रतिक्रिया

"आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे राहतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्यात कुठलेही आरोप एकमेकांवर करायचे नाहीत. काही वाटलं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायचं असं ठरलंय. शंकेचं निराकरण झालं आहे. वाद मिटलेला आहे. माझ्या गजानन कीर्तिकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा", अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.

'वाद मिटला, गजानन कीर्तिकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा', रामदास कदम यांची प्रतिक्रिया
ramdas kadamImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2023 | 10:21 PM
Share

मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात दोन दिवस दिवाळीत राजकीय फटाके फुटत होते. दोघांमध्ये शिमगा रंगलेला बघायला मिळाला. गजानन कीर्तिकर यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपली बाजू समजावून सांगितली. मीही त्यांना सांगितलं की, भविष्यात आपापसात वाद झाले तर त्यांनी मुख्य नेते मुख्यमंत्री यांच्याशी बोललं पाहिजे. डायरेक्ट प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाता कामा नये, अशी विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आपण तशा सूचना गजानन कीर्तिकर यांना द्यावा, अशी विनंती मी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली”, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.

“नवीन पक्ष आहे. सगळेजण आपल्यावर विश्वास टाकून आलेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक विश्वास लोकांनी आपल्यावर ठेवलेला आहे. असं असताना दोन नेतेच आपापसात भांडत आहेत. मतभेद दोन नेत्यांमध्येच आहेत. हे सुद्धा महाराष्ट्रात भूषणावह नाही”, असं रामदास कदम म्हणाले.

‘पक्षासाठी मी कफन बांधून रडलोय’

“रामदास कदमवर गद्दारीचा शिक्का आहे, असं बोलणं हे देखील कितपत योग्य आहे? मी आयुष्यभर लढलोय. मला मारण्याच्या अनेक लोकांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या. आज साळसकर जीवंत नाहीत. ते साक्षीदार आहेत. पक्षासाठी मी कफन बांधून रडलोय. माझ्याकडे महाराष्ट्र एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून पाहतोय. पण कोणतीही शाहनिशा न करता रामदास कदमला पूर्ण राजकारणातून संपवायचं म्हणून प्रेसनोट काढणं हे कितपत योग्य आहे?”, असा सवाल रामदास कदम यांनी दिला.

“मी माझ्या आयुष्यात कधीच कंबरेच्या खाली वार केला नव्हता. पण एखादा माणूस घरी बसतो, मी मोठा माणूस म्हणून त्यांचा आदर करतो. पण तुम्ही प्रेसनोस काढून घरी गप्प बसता? ज्या आनंद गितेंनी मला पाडलं त्या आनंद गितेंना पाडण्याचा मी प्रयत्न केला, असं गजाभाऊ सांगतात. माझ्या सख्या भावालाच मी निवडणुकीत पाडलं, असं गजाभाऊ सांगतात?”, असा सवाल कदम यांनी केला.

‘गजानन कीर्तिकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा’

“आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे राहतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्यात कुठलेही आरोप एकमेकांवर करायचे नाहीत. काही वाटलं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायचं असं ठरलंय. शंकेचं निराकरण झालं आहे. वाद मिटलेला आहे. माझ्या गजानन कीर्तिकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये गजानन कीर्तिकर तिथले स्थानिक खासदार आहेत. तेच तिथे निवडणूक लढवतील. ते तिथे निवडणूक लढवतील तर रामदास कदमला कोणतीही अडचण नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.