AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले? वाद जाणार शिंदे दरबारी

Thane News : ठाणे शहरात शिवसेनाचा वाद पुन्हा समोर आला आहे. शिवसेनेतील या गटात मागील महिन्यातही वाद झाला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करुन वाद सोडवावा, अशी मागणी दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे.

ठाणे शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले? वाद जाणार शिंदे दरबारी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 19, 2023 | 4:47 PM
Share

निखिल चव्हाण, ठाणे : ठाणे शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यात शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. हा वाद विकोपाला गेले असून प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी दोन्ही गटाने केली आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही गटात वाद झाला होता. तो वाद शांत होत नाही तोपर्यंत पुन्हा नवीन वाद झाला आहे.

कोणामध्ये झाला वाद

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे दिलीप बारटक्के यांच्या गटात हा वाद झाला आहे. या वादामुळे शिंदे गटामधील गटबाजीचे दर्शन पुन्हा झाले आहे. वर्तक नगर येथील कन्स्ट्रक्शन साईडवरील काम मिळण्यावरून प्रताप सरनाईक गट आणि दिलीप बारटक्के गट एकमेकांसमोर आले आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांच्या माणसांनी ट्रक तोडल्याचा बारटक्के गटाकडून आरोप केला आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

मागील महिन्यात झाला होता वाद

ठाणे शहरातील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर कामगारांना घरे मिळावी, यासाठी प्रताप सरनाईक यांनी मागील महिन्यात आंदोलन केले होते. त्याचवेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनीही कार्यकर्त्यांसह कंपनीमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. आपण दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. त्यानुसार स्थानिकांना कामे मिळालेली असल्याचा दावा त्यांनी केला होता.

सरनाईक विरुध्द बारटक्के

दिलीप बारटक्के व पूर्वेश प्रताप सरनाईक लोकमान्य नगरात एकाच प्रभागात नगरसेवक होते. या दोघांमध्ये पूर्वीपासूनच मतभेद असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर असते. राज्यात सत्ता आल्यानंतर हा वाद मिटेल, अशी अपेक्षा असताना त्यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. आता या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा तोडगा काढतात? हे पाहणे गरजेचे आहे.

Follow Us
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.