AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले, त्यांच्या डोक्यात सडकी…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळे आहेत. आता त्यांना रडावेच लागणार आहे. त्यांचा जाहीरपणे रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात जागोजागी सुरु करा, अशी टीका शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केली.

'मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले, त्यांच्या डोक्यात सडकी...', संजय राऊत यांचा हल्लाबोल
संजय राऊत
| Updated on: Jul 06, 2025 | 10:52 AM
Share

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीच्या लोकांची डोकी चालत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून विचित्र विधान केली जात आहे. त्यांच्या डोक्यात सडकी बटाटे भरली आहेत. शनिवारी झालेल्या विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळे आहेत. आता त्यांना रडावेच लागणार आहे. त्यांचा जाहीरपणे रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात जागोजागी सुरु करा. आम्ही तुमचे कार्यक्रम लावतो, असा हल्ला शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी महायुतीवर केला.

अनेक राज्यांतील नेत्यांकडून अभिनंदन

संजय राऊत म्हणाले, विजय मेळाव्यानंतर संपूर्ण देशात हिंदी सक्तीविरोधात वातावरण निर्माण झाले. अनेक राज्याच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर केंद्राच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात लढण्याचे बळ मिळाल्याचे अनेक राज्यातील नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे महाराष्ट्र मुंबईत एकटवला होता, असे दिसून आले.

राज ठाकरे यांची विधानेही राजकीयच

राज ठाकरे यांचे भाषण राजकीय नव्हते पण उद्धव ठाकरे यांचे राजकीय भाषण झाले? या टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे यांचे भाषण कोणाला कळले असले तर त्यांनीसुद्धा राजकीय भूमिका भाषणात मांडली आहे. सक्ती लावून तर दाखवा…, सत्ता तुमची विधानसभेत असेल, आम्ही रस्त्यावर आहोत…अशी विधाने त्यांनी केली. ही राजकीय विधाने आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी ५५ वर्षांपूर्वी हेच विधान केले होते. एअर इंडियात भूमीपुत्रांची भरती केली जात नव्हती. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, तुमची विमाने हवेत आहे, पण मुंबईतील रस्ते आमचे आहेत. हे सुद्धा राजकीय विधान होते.

काय बोलावे हे ठाकरे यांना सांगावे लागत नाही. ठाकरे घराण्यास लेखणी आणि वाणीची परंपरा मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर त्यांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे, असे राऊत यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेवर हल्ला करताना ते म्हणाले, शिंदे आता वडे, भजी, कांदा पोहे खात नाही. ते ढोकळा खातात. त्यांच्या नातवाला पण खाऊ घालत आहे. त्यांची दाढी ही नकली आहे. ती महाराजांची दाढी नाही. अमित शहा हे कधीही कापू शकता. त्यांची दाढी ही गद्दारांची आहे. अफजल खानाची आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.