AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचा दसरा मेळावा, राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोणतीही अडचण येऊ नये यादृष्टीने राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. बंद सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आता हटविण्यात आली आहे. त्यामुळे षण्मुखानंद सभागृहातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकूण क्षमतेच्या 50 टक्के (एक हजारहून अधिक) पदाधिकारी उपस्थित राहू शकतील.

शिवसेनेचा दसरा मेळावा, राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 11:43 AM
Share

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज विजयादशमीच्या मुहूर्तावर होणार आहे. सायंकाळी सात वाजता माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली आहे, तसेच शिवसेना प्रमुखांच्या भाषणाने राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोणतीही अडचण येऊ नये यादृष्टीने राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. बंद सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आता हटविण्यात आली आहे. त्यामुळे षण्मुखानंद सभागृहातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकूण क्षमतेच्या 50 टक्के (एक हजारहून अधिक) पदाधिकारी उपस्थित राहू शकतील.

राज्यात 22 ऑक्टोबरपासून बहुतांश निर्बंध शिथिल होणार आहेत. मात्र, कोणत्याही बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला एकूण क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती. अशा स्थितीत दसरा मेळाव्यात गर्दी होऊन करोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांची टीका आणि न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता काहींनी पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणली.

त्यानंतर सरकारी पातळीवर सूत्रे हलली आणि या मेळाव्यापुढील संभाव्य मोठा अडथळा दूर करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर बराच खल झाल्याचे समजते. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढून टाकली आहे.

संबंधित बातम्या :

गर्व से कहो हम हिंदू हैं, मनसेने डिवचलं, सेना भवनासमोर पोस्टरबाजी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचेही नेते, फडणवीस म्हणतात, शिवसेनेचं हे बदलतं रुप!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.