AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारकडे केली मोठी मागणी, म्हणाले “हिंमत असेल तर आज…”

जेव्हा या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर झाला, त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की या अर्थसंकल्पात मुंबईसाठी तसेच महाराष्ट्रासाठी काय मिळाले? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारकडे केली मोठी मागणी, म्हणाले हिंमत असेल तर आज...
| Updated on: Jul 12, 2024 | 4:18 PM
Share

Aaditya Thackeray Big Demand : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. “बहुमजली झोपडपट्ट्यांना पात्र करुन कायदेशीर घरं द्यावीत”, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

“आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि खोके सरकारचे देखील हे शेवटचे अधिवेशन आहे. जेव्हा या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर झाला, त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की या अर्थसंकल्पात मुंबईसाठी तसेच महाराष्ट्रासाठी काय मिळाले? एकंदरीतच गाजर बजेट पाहायला मिळत आहे. पण मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर किंवा इतर शहर असतील त्यांना या बजेटमधून काहीही मिळालेलं नाही”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी जिथे जिथे झोपडपट्टी पुनवर्सन हे प्रकल्प रखडले आहेत, तिथे म्हाडासारखे जसं आपण बीडीडीचा विकास केला तसंच कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारने विकास करावा, ही आमची पहिली मागणी होती”, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

बहुमजली झोपडपट्ट्यांना पात्र करुन घर द्या

“तसेच बहुमजली ज्या काही झोपडपट्ट्या आहेत. अनेक ठिकाणी G+1, G+2 अशा झोपडपट्ट्या पाहायला मिळत आहेत. त्यांनाही पात्रता यादीत घेण्यात यावं. त्यांनाही पात्र करुन ही घर देण्यात यावीत. मी आज मिंधे सरकारला खोके सरकारला चॅलेंज करतो की हिंमत असेल तर आज शेवटचा दिवशी मुंबईसाठी, आमच्यासाठी ही मागणी मान्य करा. तसेच बहुमजली एसआरएदेखील मान्य करा, कारण ती मुंबईकरांची गरज आहे. जर आमचं सरकार आलं तर आम्ही हे करुच”, अशा दोन मागण्या आदित्य ठाकरेंनी मांडल्या.

अर्थसंकल्पात नवनवीन घोषणा

दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवनवीन घोषणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण , शेतकऱ्यांना मोफत वीज, विद्यार्थ्यांना विद्यावेतन, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, ७ लाख लखपती दिदींसाठी, यांसह अनेक नवनवीन योजनांची घोषणा करण्यात आली. पण या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालं नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.