AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या फळविक्रेत्याचा भयानक प्रताप, Video पाहून तुम्ही फळं खाणं सोडून द्याल

मुंबईच्या मालाडमध्ये एका फळविक्रेत्याने उंदीर मारण्याचे 'राटोल' औषध फळांना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या या रसायनामुळे मोठी खळबळ उडाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या फळविक्रेत्याचा भयानक प्रताप, Video पाहून तुम्ही फळं खाणं सोडून द्याल
Mumbai Malad Fruit Vendor
| Updated on: Feb 25, 2026 | 9:47 AM
Share

नफ्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचा एक संतापजनक प्रकार मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आला आहे. एका फळ विक्रेत्याने चक्क उंदीर मारण्याचे औषध Ratol फळांना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आर्थिक फायद्यासाठी हजारो निष्पाप नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली आहे.

नेमक काय घडलं?

मालाडमधील एका गजबजलेल्या भागात हा परप्रांतीय विक्रेता आपला फळांची गाडी लावायचा. रात्रीच्या वेळी गोदामात किंवा गाड्यावर उंदीर फळे कुरतडतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी या विक्रेत्याने चक्क सफरचंद आणि डाळिंब यांसारख्या महागड्या फळांच्या सालीला Ratol हे उंदीर मारण्याचे औषध लावायचा. यानंतर काही जागरूक नागरिकांनी या विक्रेत्याला फळांना पिवळसर-काळपट क्रीम लावताना रंगेहाथ पकडले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला दम भरल्यानंतर त्याने उंदीर फळे खाऊ नयेत म्हणून मी हे करतोय, अशी धक्कादायक कबुली दिली.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या फळ विक्रेत्याचा संपूर्ण प्रताप समोर आला आहे. या घटनेमुळे मुंबईतील स्ट्रीट फूड आणि उघड्यावर विकल्या जाणाऱ्या फळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी या विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिकांनी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या संपूर्ण भागातील फळांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

राटोल किती धोकादायक?

‘Ratol’ मध्ये यलो फॉस्फरस (Yellow Phosphorus) नावाचे घातक रसायन असते. हे रसायन मानवी शरीरासाठी मृत्यूचा सापळा ठरू शकते. हे विष पोटात गेल्यास रक्ताभिसरण प्रक्रियेत मिसळून यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) निकामी करू शकते. हे विषारी क्रीम फळांच्या सालीमध्ये झिरपते. त्यामुळे फळे गरम पाण्याने धुतली तरी त्यातील विषाचा अंश पूर्णपणे नष्ट होत नाही. लहान मुले अनेकदा फळे न सोलता किंवा अर्धवट धुवून खातात, अशा वेळी हे विष त्यांच्यासाठी तत्काळ प्राणघातक ठरू शकते. या घटनेनंतर आता नागरिकांनी बाजारातून फळे आणल्यानंतर ती किमान २० मिनिटे कोमट पाण्यात मीठ टाकून भिजत ठेवावीत आणि शक्य असल्यास साली काढूनच फळांचे सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पाहा व्हिडीओ

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस