AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…त्यामुळे भाजपने हे पाऊल उचललं असावं’; सुप्रिया सुळे यांचं पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य!

दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्ष सुप्रिया सुळे कॅमेरासमोर दिसल्या नव्हत्या. अखेर रात्री 11.30 वाजता मुंबईमधील प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी यावर आपल प्रतिक्रिया दिली आहे.

'...त्यामुळे भाजपने हे पाऊल उचललं असावं';  सुप्रिया सुळे यांचं पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य!
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 03, 2023 | 12:53 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकामध्ये जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्ष सुप्रिया सुळे कॅमेरासमोर दिसल्या नव्हत्या. अखेर रात्री 11.30 वाजता मुंबईमधील प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी यावर आपल प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

विधानसभा जिंकण्याचा भाजपला विश्वास नसावा त्यामुळे भाजपने हे पाऊल उचललं असावं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णयाचा अधिकार आहे. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला आहे.  गेलेले आमदार माझे सहकारी नाहीतर कुटुंबातील लोक आहेत, ही घटना मला वेदना देणारी आहे. शरद पवार हीच आमची प्रेरणा असून नव्या उमेदीने संघटना उभी करू. नाती आणि कामात गल्लत नको याची जाणीव असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सोडून गेलेल्या आमदारांबाबत आदर अजितदादा माझा कायम मोठा भाऊ म्हणून राहिल. भाजपने राष्ट्रवादीवर केलेल्यावर आरोपांवर भाजपच उत्तर देईल. दादा आणि माझ्यात कधीवाद होऊ शकत नाही. दादा माझ्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे मी स्वत:च कधीच वाद घालणार नाही. मी कुणाच्या बाजूने नाही, मी पक्षाच्या बाजूने असून कायम पक्षासोबतच असणार आहे. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील? 

राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी पक्षाला कोणतीही कल्पना न देता सत्ताधारी पक्षात जात शपथ घेतली. शरद पवार यांना अंधारात ठेवत ही कृती केली त्यामुळे आम्ही संबंधित आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना मेल पाठवला आहे. अध्यक्षांनी आमची बाजू ऐकून घ्यावी, विधानसभेचे अध्यक्ष यांनी लवकरात लवकर आम्हाला बोलवावं. उद्या लवकरात लवकर या पिटिशनसाठी आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली आहे. निवडणूक आयोगालाही याबाबत आम्ही माहिती दिली नाही. 9 आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही, आम्ही सर्व कायदेशीर पावलं उचलली असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.