AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कुणाकडे?

Bcci Indian Cricket Team | बीसीसीआयने टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Team India | टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कुणाकडे?
टीम इंडियामध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. यासाठी सर्व खेळाडू खूप मेहनत घेत असतात. मात्र यामधील काहींचं हे फक्त स्वप्नच राहून जातं. तर काही शेवटपर्यंत जिद्द चिकाटी सोडत नाहीत आणि आपलं लक्ष्य गाठल्यावरच ते थांबतात. महिला भारतीय संघामध्ये एका आदिवासी पाड्यामधील एका खेळाडू टीम इंडियाकडून खेळत आहे.
| Updated on: Jul 02, 2023 | 11:08 PM
Share

मुंबई | क्रिकेट टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने 2 टेस्ट आणि 3 वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा 23 जून रोजी केली आहे. कसोटी आणि वनडे या दोन्ही मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर टी 20 मालिकेसाठी अजूनही संघ जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र त्याआधी या टी 20 सारिजमध्ये हार्दिक पंड्या कॅप्टनसी करणार असल्याचं निश्चित आहे. तसेच या सीरिजमध्ये युवा खेळाडूंनासंधी देण्यात असल्याचं म्हटलं जात आहे.

टीम इंडियाचा बांगालदेश दौरा

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याआधी बीसीसीआयने बांगलादेश दौऱ्यााठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वूमन्स टीम इंडिया जुलै महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया यांच्यात प्रत्येकी 3-3 वनडे आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात 9 जूलैपासून टी 20 मालिकेने होणार आहे. तर 22 जुलैला वनडे सीरिजने दौऱ्याची सांगता होणार आहे.

कर्णधारपदाची जबाबदारी कोणाला?

वनडे आणि टी 20 या दोन्ही मालिकांमध्ये हरमनप्रीत कौर ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना हीला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उमा चेत्री, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी आणि मिन्नू मणी या चौघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.

बांगलादेश दौऱ्याासाठी वूमन्स टीम इंडिया जाहीर

एकाच स्टेडियममध्ये दोन्ही मालिकांचं आयोजन

या दोन्ही मालिकेतील एकूण 6 सामन्यांचं आयोजन हे शेरे बांगला स्टेडियम, ढाका इथे करण्यात आलं आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, रविवार 9 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.

दुसरा सामना, मंगळवार 11 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.

तिसरा सामना, गुरुवार 13 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिली वनडे, रविवार 16 जुलै, सकाळी 9 वाजता.

दुसरी वनडे, बुधवार 19 जुलै, सकाळी 9 वाजता.

तिसरी वनडे, शनिवार 22 जुलै, सकाळी 9 वाजता.

बांगलादेश विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य,अमनजोत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, उमा चेत्री (विकेटकीपर), राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी आणि मिन्नू मणी.

बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (सी), स्मृती मानधना (व्हीसी), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सरवाणी, मोनिका पटेल, स्नेह राणा, उमा चेत्री (विकेटकीपर), राशी कनोजिया आणि अनुषा बरेड्डी.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.