AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार? अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी असे का म्हटले?

राजकारणाचे मैदान आहे. दुर्दैवाने त्यात प्रवेश करणारे पैलवान हिंसाचाराची भाषा वापरत आहेत. निशिकांत दुबे असोत किंवा राज ठाकरे दोन्ही नेते हिंसाचाराची भाषा बोलत आहेत, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार? अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी असे का म्हटले?
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
| Updated on: Jul 19, 2025 | 2:23 PM
Share

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाईला राज्यमाता म्हणून घोषित केले होते. यामुळे आम्ही त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. जर एकनाथ शिंदे यांच्यासारखे काही दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केले तर आम्ही त्यांचाही विचार करू. जे विरोध करतात ते विरोध करतात, पण काम करणाऱ्याचेच नाव लिहिले जाते, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांना सवाल?

गुजरातमध्ये गुजराती आणि महाराष्ट्रात मराठी बोलली जाते. मराठीच्या नावाखाली महाराष्ट्र वेगळा झाला. गुजरात गुजरातीच्या नावाखाली निर्माण झाला. मग आता मराठी मुंबई गुजरातमध्ये कसे जाईल. गुजरात महाराष्ट्रात कसा जाईल. भाषेच्या नावाखाली गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये झाली. मग हिंदी भाषा सुरू करून तुम्ही मुंबईला गुजरातशी कसे जोडणार? मुंबईला गुजरातशी जोडण्याच्या योजना जिथे बनवल्या जात होत्या, तिथे राज ठाकरे बसले होते का? असा उपरोधिक प्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राज ठाकरे यांना विचारला.

राजकारणाच्या मैदानात पैलवान?

राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यात सुरु असलेल्या वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, हे राजकारणाचे मैदान आहे. दुर्दैवाने त्यात प्रवेश करणारे पैलवान हिंसाचाराची भाषा वापरत आहेत. निशिकांत दुबे असोत किंवा राज ठाकरे दोन्ही नेते हिंसाचाराची भाषा बोलत आहेत. बुद्धिमान लोकांनी हिंसाचाराला किती प्रमाणात स्थान देणे योग्य आहे? त्याचा विचार केला पाहिजे.

शिवसेना फुटीवर बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, जोपर्यंत आपण बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहू, तोपर्यंत प्रत्येक तुकडा, मग तो एक असो, दोन असो त्याला शिवसेना म्हटले जाईल. जेव्हा सगळे खरे असतात तेव्हा खोटे कोण? सगळे म्हणत असतात की आपण खरे आहोत, आपण खरे आहोत, असे त्यांनी म्हटले.

धर्मच हनी ट्रॅपपासून वाचवणार

तुम्हाला हनी ट्रॅपपासून कोणीही वाचवू शकत नाही. फक्त धर्मच तुम्हाला त्यातून वाचवू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात धर्म स्वीकाराल तेव्हा तुम्ही अशा अनैतिक गोष्टींपासून आपोआप दूर राहाल. मग कोणीही तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये अडकवू शकणार नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.