AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलुगु सुपरस्टार पवन कल्याणचे मराठीतून तडाखेबंद भाषण, नांदेडमध्ये शिट्ट्या, टाळ्यांचा पाऊस, जनतेने असं घेतलं डोक्यावर, Video पाहीला का?

Telegu Superstar Pawan Kalyan : तेलुगु सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या मराठातील भाषणाची राज्यात एकच चर्चा सुरू आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नांदेड जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठीतील भाषणाने सर्वांची मनं जिंकली.

तेलुगु सुपरस्टार पवन कल्याणचे मराठीतून तडाखेबंद भाषण, नांदेडमध्ये शिट्ट्या, टाळ्यांचा पाऊस, जनतेने असं घेतलं डोक्यावर, Video पाहीला का?
पवन कल्याण यांचं मराठीतून भाषण
| Updated on: Nov 17, 2024 | 4:05 PM
Share

तेलुगु सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मराठीतून भाषण केले. अगदी काही मिनिटांच्या या मराठी संवादाने त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिकंली. त्यांच्या भाषणानं एक औरच रंगत आणली. यावेळी जनतेतून टाळ्या, शिट्यांनी मैदान दणाणून गेले. त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्यांच्या मराठीतील भाषण लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यांच्या भाषणाचा Video समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

नांदेड जिल्ह्यात दोन सभा

पवन कल्याण हे शनिवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यात पाळज आणि देगलूर येथे सभा घेतली. या सभेतील त्यांचे मराठीतील भाषण चांगलेच गाजले. भोकर येथील भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. त्यानंतर जितेश अंतापुरकरांसाठी त्यांनी देगलूर येथे सभा घेतली.

मराठीतून केली भाषणाची सुरुवात

या सभेत पवन कल्याण यांच्या भाषणाची सर्वाधिक चर्चा झाली. मी मराठीत बोलताना चुकलो तर मला माफ करा अशी सुरूवात त्यांनी केली. संतांची भूमी, वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र, या भूमीतील संतांना, छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो. माझ्या लाडक्या भावांना, लाडक्या बहि‍णींना नमस्कार करतो. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आलं, याचा मला आनंद आहे. रामराम महाराष्ट्र. या मराठ्यांच्या भूमीत सन्मान आहे. स्वराज्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान नेत्याच्या भूमीवर आहे, असे पवन कल्याण म्हणाले.

त्यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. जनसेने या आपल्या पक्षाच्या सात तत्त्वांपैकी एक राष्ट्रवाद आणि प्रादेशिकता यांचे मिश्रण बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांनी प्रेरित असल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहीण योजनेचे त्यांनी कौतुक केले. या योजनेमुळे महिलांची आर्थिक उन्नती होईल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उमेदवारांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात