AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलायमसिंह यादव यांना पुरस्कार हे आक्रितच, मोदी सरकार वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांना विसरले; ‘सामना’तून हल्ला

बाबरी मशिद पाडली त्यानंतर मुलासमय सिंह यादव यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता. त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपला झाला नसता.

मुलायमसिंह यादव यांना पुरस्कार हे आक्रितच, मोदी सरकार वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांना विसरले; 'सामना'तून हल्ला
veer savarkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 28, 2023 | 7:34 AM
Share

मुंबई: केंद्र सरकारने समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ज्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळया घालून ठार केलं, ज्या मुलायमसिंह यांना भाजपने ‘मौलाना मुलायम’ म्हणून हिणवलं त्याच मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना मोदी सरकार विसरले. सावरकरांना पुरस्कार देण्यापासून मोदी सरकारला कोणी रोखले होते? असा संतप्त सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेकांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील अनेक नावे संघ परिवाराशी संबंधित आहेत. अर्थात त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

हे आक्रितच म्हणावे लागेल

मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी कारसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना भाजपने केली. त्यांना मौलाना मुलायम म्हणून हिणवलं. त्याच मुलायमसिंह यादव यांना भाजपने सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. प्रखर हिंदुत्ववादी मोदी सरकारने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मुलायमसिंह यादव यांना दिला, अशी टीका अग्रलेखातून करणअयात आली आहे.

ते ऋण फेडण्यासाठी

बाबरी मशिद पाडली त्यानंतर मुलासमय सिंह यादव यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता. त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपला झाला नसता. ते ऋण फेडण्यासाठीच मुलायम सिंग यादव यांना सन्मानित करण्यात आले काय? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

कोणी रोखले?

बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांना भारतरत्नाने सन्मानित केले जाईल असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? असा सवालही करण्यात आला आहे.

तर ढोंग लपले असते

बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणारे सरकार राज्यात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांच्या नावाची भारतरत्नासाठी शिफारस केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

Follow Us
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल