AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या तीन जागा हव्याच…; मनसे-ठाकरे गटात जागावाटपावरुन बिनसलं, युतीचं गणित बिघडणार?

ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा पेच आता माहिम, विक्रोळी आणि शिवडी या तीन जागांवर येऊन थांबला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत यावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता असून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या समीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

त्या तीन जागा हव्याच...; मनसे-ठाकरे गटात जागावाटपावरुन बिनसलं, युतीचं गणित बिघडणार?
raj thackeray uddhav thackeray
| Updated on: Dec 19, 2025 | 12:21 PM
Share

सध्या राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या अनेक बैठका पार पडताना दिसत आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बहुतांश जागांवर सहमती झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जिथे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत, अशा तीन महत्त्वाच्या जागांवरून मोठा पेच निर्माण झाला आहे.

मनसेकडून कोणत्या तीन जागांची मागणी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ज्या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत, तिथल्या किमान तीन जागा आम्हाला हव्याच, अशी आग्रही मागणी मनसेने लावून धरली आहे. यामध्ये माहिम, शिवडी आणि विक्रोळी या तीन विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रभागांचा समावेश आहे. माहिम हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. या ठिकाणी मनसेला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. मात्र, ठाकरे गटाचा येथे जुना बालेकिल्ला असल्याने ते माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शिवडीतून अजय चौधरी आणि विक्रोळीतून सुनील राऊत हे ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गट आपल्या आमदारांच्या मतदारसंघात मनसेला जागा देणार का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जागावाटपाच्या बैठकांचे सत्र सुरू

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन बैठका घेत आहेत. संजय राऊत, अनिल परब, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यात सातत्याने जागावाटपाच्या बैठकांचे सत्र सुरू होते. आतापर्यंत इतर ठिकाणच्या जागावाटपांचा तिढा सुटला असला तरी या तीन जागी मात्र नेत्यांना तोडगा काढता आलेला नाही. परिणामी, आता हा चेंडू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे-ठाकरेंची युती होणार का?

दरम्यान महायुतीला म्हणजेच भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांना टक्कर देण्यासाठी मराठी मतांचे विभाजन टाळणे हे दोन्ही ठाकरेंचे प्राथमिक ध्येय आहे. जर या तीन जागांवरून सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर मनसे-ठाकरेंची युती होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.