AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी, आमदार पळून जाण्याची भीती’, विरोधी पक्षनेत्याचा सर्वात मोठा दावा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केलीय.

'शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी, आमदार पळून जाण्याची भीती', विरोधी पक्षनेत्याचा सर्वात मोठा दावा
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 05, 2023 | 7:12 PM
Share

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. राज्य सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे दिल्लीत काल मंत्रिमंडळाच्या विस्तारावर खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत दिले आहेत. असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा दावा केला आहे. सत्ताधारी पक्षांना आमदार पळून जाण्याची भीती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. सरकारकडून फक्त वेळकाढूपणा केला जाईल, असा दावा अंबादास दानवे यांनी केलाय.

“मंत्रिमंडळ विस्तारात किती जागा भेटतील याचा आधी विचार करुन ठेवा. कित्येक लोक म्हणतात की यांना आता भाजपच्या चिन्हावर लढावं लागणार आहे. भाजप हेच करणार आहे. लढा पण आमच्या चिन्हावर लढा. असे अनेक अनुभव आलेले आहेत. कॅबिनेटचा विस्तार हे करत करतच राहून जातील”, असं अंबादास दानवे म्हणाले.

‘मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता फार कमी’

“सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आमदारांना सांभाळायचं आहे, मग अशा घोषणा करा. आता अधिवेशन येतंय. अधिवेशनआधी होईल सांगत आहेत. नंतर पुन्हा वेळेवर सांगतील की, अधिवेशन झाल्यावर करु. पण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता फार कमी आहे. ते फक्त घोषणाबाजी करत आहेत”, असंदेखील दानवे म्हणाले.

दरम्यान, अहमदनगरमध्ये एका मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुणांनी नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरुनही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“हे सगळे नुसते बोलबच्चन लोकं आहेत. औरंगजेबाचा फोटो घेऊन काल लोकं नाचत होते. दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये औरंगजेबचा फोटो घेऊन लोकं नाचत होते. हे स्वत:ला मोठे हिंदुत्ववादी समजून घेतात. औरंगजेबाचं लोक एवढं उदात्तीकरण करत आहेत. यांनी काय कारवाई केली? हे फार हिंदुत्ववादी आहेत ना?”, असे सवाल दानवे यांनी केले.

“अहमदनगरमध्ये एका ठिकाणी 17 वर्षीय मुलीला राहत्या घरातून उचलून नेलं. पीडित मुलीच्या आई-वडिलांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस आंदोलन करावं लागलं. अजूनही त्या मुलीचा तपास लागलेला नाही. सुरुवातीला पोलीस ठाण्या गुन्हा दाखल होत नव्हता. मुलीचे आई-वडील उपोषणाला बसले आहेत. सरकार कसलं हिदुत्ववादी आहे? हे सरकार औरंगजेबाचं उदात्तीकरण करतं. हे सरकार त्यांना अटक करणार नाही”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....