AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसतं, रावणाच्या नाही”;ठाकरे गटाच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

आताच्या राजकारणात तुम्ही जरी धनुष्यबाण घेऊन आला असला तरी, आता आम्ही मशाल घेऊन येऊ आणि त्या आमच्या मशालीनं पळवून लावू आणि तुमची दाढीपण जाळून टाकू अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसतं, रावणाच्या नाही;ठाकरे गटाच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
| Updated on: Feb 25, 2023 | 11:31 PM
Share

मुंबईः एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर दोन्ही गटातीली नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यातच कसबा पोटनिवडणूक लागल्याने राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे आताही ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. आजही ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसतं, रावणाच्या नाही असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याव केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटातील वाद उफाळून येण्याची चिन्हं दिसत आहेत.

ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, ज्या प्रमाणे धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसतं रावणाच्या हाती ते शोभून दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळाले असले तरी ते तुम्हाला शोभून दिसत नाही.

आताच्या राजकारणात तुम्ही जरी धनुष्यबाण घेऊन आला असला तरी, आता आम्ही मशाल घेऊन येऊ आणि त्या आमच्या मशालीनं पळवून लावू आणि तुमची दाढीपण जाळून टाकू अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवधनुष्य घेऊन येत असले तरी आम्ही पण आता मशाल घेऊन येऊ. त्या मशालीनेच सगळा बदल करू आणि त्यामध्ये दाढीही जाळून टाकू असा घणाघात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

ठाकरे गटाच्या सुभाष देसाई यांच्या या टीकेमुळे आता दोन्ही गटातील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यातच तुमची दाढी जाळून टाकू अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे त्यावरूनही तो वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे असं मत व्यक्त केले जात आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.