AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला

Sanjay Raut Criticized Radhakrushan Vikhe Patil : संजय राऊत यांनी सकाळी सकाळीच शिंदे सेनेवर आगपाखड केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विखारी टीका केली. त्यांच्या टीकेने एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले राऊत?

ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
संजय राऊत
| Updated on: Feb 23, 2025 | 12:10 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तोंडसुख घेतले. तर या दरम्यान त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विखारी टीका केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यावरून राज्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांची विखे पाटलांवर विखारी टीका

महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. कोण विखे पाटील जे दहा वेळा पक्ष सोडून पळून गेले. त्यांना मंत्री पद पहिले शवसेनेने उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी विसरू नये. त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहे. दहा वेळा साड्या बदलणारी लोक आहेत हे त्यांनी आम्हाला शिकवू नये काय आहेत ते, असा टोला राऊतांनी लगावला.

तुम्हाला देखील धक्का बसेल भविष्यात विसरू नका. धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलत आहेत. हिम्मत आणि धाडस असते तर पक्ष बदलले नसते. ज्या काँग्रेस पक्षांनी तुम्हाला सर्व काही दिलं मानपान प्रतिष्ठान सत्ता शिवसेनेने देखील तुम्हाला दिला आहे. त्या शिवसेनेबद्दल तुम्ही असं वक्तव्य करतात हा निर्लज्य आणि नीचपणा आहे, असा घणाघात त्यांनी घातला.

काय केली होती विखेंनी टीका

उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळलं आहे. ते बेताल विधान करत आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय योग्य आहे. हे कायद्याचे राज्य आहे. असी जळजळीत टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने नोटीस दिली होती. गाण्यातील जय भवानी शब्द हटवण्यावरून हा वाद होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली. त्यामुळे हा वाद उफाळला आहे. त्यावर आता विखे पाटील समर्थकांकडून काय उत्तर येते, ते समोर येईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.