AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ते राम मंदिराची तारीख सांगत नाहीत आणि हे सरकारमधून बाहेर पडण्याची”

मुंबई : ते राम मंदिर बांधण्याची तारीख सांगत नाहीत आणि हे सरकारमधून बाहेर पडण्याची तारीख सांगत नाहीत, असे म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजप आणि शिवसेनेवर निशणा साधला. संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन दोन्ही पक्षांवर टीका केली. राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येयात्रेवर गेले आहेत. त्यावरुन सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात राम […]

ते राम मंदिराची तारीख सांगत नाहीत आणि हे सरकारमधून बाहेर पडण्याची
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

मुंबई : ते राम मंदिर बांधण्याची तारीख सांगत नाहीत आणि हे सरकारमधून बाहेर पडण्याची तारीख सांगत नाहीत, असे म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजप आणि शिवसेनेवर निशणा साधला. संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन दोन्ही पक्षांवर टीका केली. राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येयात्रेवर गेले आहेत. त्यावरुन सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली.

संजय निरुपम नेमकं काय म्हणाले, त्यांचा ट्वीट :

उद्धव ठाकरे अयोध्येत!

उद्धव ठाकरे हे कालपासून अयोध्यायात्रेवर आहेत. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांची फौज घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत. काल उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध शरयू नदीवर महाआरती झाली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं.

राज्यात दुष्काळ असताना, विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना, राज्याच्या कानाकोपऱ्यातून अन्याग्रस्त जनता राजधानी मुंबईत न्याय मागण्यासाठी आली असताना, मुंबईचे कर्तेधर्ते समजणारे आणि राज्याच्या सत्तेतील वाटेकरी असणारे उद्धव ठाकरे मात्र राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील अयोध्येत दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातून शिवसेनेवर टीका होत आहे.

शिवसेनाही सत्तेत आहे आणि राम मंदिर बांधण्याचा प्रश्नही ते सत्तेला विचार आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या या दुटप्पी धोरणावर सर्वजण टीका करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

राम मंदिर भाजपचा चुनावी जुमला : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.