AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरुन आरोप-प्रत्यारोप, पाहा व्हिडीओ

मतदानाचा पाचवा टप्पा संपला असला तरी मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरुन वाद कायम आहे. यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतायत. निवडणूक आयोगानं त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय. अंतिम आकड्यांमध्ये १ कोटी ७ लाखं मतं वाढल्याचा आरोप काँग्रेसनं का केलाय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरुन आरोप-प्रत्यारोप, पाहा व्हिडीओ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 23, 2024 | 10:10 PM
Share

मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरुन आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. पाचव्या टप्प्यात म्हणजे 20 तारखेला महाराष्ट्रात किती टक्के मतदान झालं, याची अंतिम आकडेवारी आज म्हणजे ३ दिवसांनी निवडणूक आयोगानं जारी केली. 20 तारखेला रात्री पावणे आठ वाजता निवडणूक आयोगानं अंदाजीत आकडेवारी दिली की महाराष्ट्रातलं मतदान हे 48.88 टक्के इतकं झालंय. यानंतर २० तारखेलाच रात्री साडे ११ वाजता निवडणूक आयोगानं नवा सुधारित अंदाज सांगितला की महाराष्ट्रातलं मतदान 54.29 टक्के झालंय.

पाहा व्हिडीओ:-

आज म्हणजे २३ तारखेला निवडणूक आयोगानं अंतिम आकडेवारी जाहीर करत महाराष्ट्रात 56.89 टक्के मतदान झाल्याचं सांगितलंय. आता मतदारसंघ निहाय मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किती आकडेवारी होती आणि अंतिम आकडेवारी किती होती पाहा.

भिवंडीत 20 तारखेला 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगानं 48.89 टक्के मतदानाचा अंदाजित आकडेवारी दिली होती. निवडणूक आयोगानं आज अंतिम आकडा जाहीर केलाय, 59.89 टक्के. धुळ्याचा अंदाजित आकडा होता 48.81टक्के. अंतिम आकडा आहे 60.21 टक्के. दिंडोरीत 57.06 टक्के, अंतिम आकडा आहे 66.75 टक्के, कल्याण 41.70 टक्के., अंतिम आकडा 50.12 टक्के, नाशिकमध्ये 51.16 टक्के, अंतिम आकडा आहे 60.75 टक्के, मुंबई उत्तर लोकसभेत 46.91 टक्के, अंतिम आकडा 57.02 टक्के मुंबई उत्तर मध्य मध्ये 47.32 टक्के, अंतिम आकडा आहे 51.98 टक्के, मुंबई उत्तर पूर्व मध्ये 48.67 टक्के, अंतिम आकडा आहे 56.37 टक्के , मुंबई उत्तर पश्चिममध्ये 49.79 टक्के, अंतिम आकडा 54.84 टक्के, मुंबई दक्षिणमध्ये 44.22 टक्के, अंतिम आकडा 50.06 टक्के, मुंबई दक्षिण मध्य मध्ये 48.26 टक्के, आणि अंतिम आकडा आहे 53.60 टक्के यावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आहे.

अनेक मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत झालेलं मतदान संध्याकाळी ६ पर्यंत रांगेत उभ्या असलेल्या लोकांचं मतदान आणि दुर्गम भागातली आकडेवारी अपडेट होण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी. यामुळे अंदाजित आणि अंतिम आकड्यात फरक आहे. दरम्यान पहिल्या चार टप्प्यात अंदाजित आणि अंतिम आकडेवारीत तब्बल १ कोटी ७ लाख मतदान कसं काय वाढलं. यावर काँग्रेसनं निवडणूक आयोगाला प्रश्न केले आहेत.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?