AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार, अमित शाह त्यावेळी नेमकं काय बोलले?

जर शब्द दिला होता तर मग जाहीरसभेत मोदी आणि अमित शाहांसमोर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन का बोलले नाही?, असा सवाल भाजपच्या मुनगंटीवारांनी केला. मात्र शिंदेंचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाटांनीही भुवया उंचावणारं वक्तव्य करत ठाकरेंनी घेतलेली तुळजाभवानीची शपथ खरी असल्याचं सांगितलं.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार, अमित शाह त्यावेळी नेमकं काय बोलले?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2024 | 11:31 PM
Share

मुंबई : निवडणूक लोकसभेची असली तरी, पुन्हा एकदा, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचाच मुद्दा गाजणार हे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट झालं. 2019मध्ये अमित शाहांनी मातोश्रीवर अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. त्यामुळं तुळजाभवनाची शपथ घेऊन सांगतो की शाह खोटं बोलत आहेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी धाराशीवमधून केलाय. जर शब्द दिला होता तर मग जाहीरसभेत मोदी आणि अमित शाहांसमोर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन का बोलले नाही?, असा सवाल भाजपच्या मुनगंटीवारांनी केला. मात्र शिंदेंचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाटांनीही भुवया उंचावणारं वक्तव्य करत ठाकरेंनी घेतलेली तुळजाभवानीची शपथ खरी असल्याचं सांगितलं.

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजपनं दिला होता असं शिरसाट म्हणालेत. त्याचवेळी शरद पवारांनी पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यानं ठाकरेंनीच निकालानंतर युती मोडल्याचंही शिरसाटाचं म्हणणंय.अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द शाहांनी दिला असं उद्धव ठाकरे सांगतायत तो दिवस होता 18 फेब्रुवारी 2019. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर आले, मातोश्रीवर अमित शाह, फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. मातोश्रीवर शाह आणि उद्धव ठाकरेंची स्वतंत्रही चर्चा झाली.

एकाच गाडीतून फडणवीस अमित शाह उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मातोश्री बाहेर पडले. वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकसभेसह विधानसभेतही एकत्र लढण्याची घोषणा केली. पद तसंच जबाबदाऱ्यांमध्ये समानता असेल अशी घोषणा फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी केली होती पण 2019च्या विधानसभेच्या निकालानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन भाजप शिवसेनेत फिस्कटलं आणि ठाकरे कट्टर विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं मुख्यमंत्री झाले. मात्र ठाकरेंनी आता अमित शाहांना घेरण्यास सुरुवात केलीय.

तुळजापूरनंतर कळंबच्या सभेतही 12 तासांच्याच दुसऱ्यांदा तुळजाभवनीची शपथ घेऊन अमित शाहांवर ठाकरेंनी हल्लाबोल केला. आता पुन्हा एकदा आपलं शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण झालेलं नाही. हे सांगतानाच शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच असं उद्धव ठाकरे म्हणालेत.तु ळजाभवनीची शपथ घेऊन ठाकरे अमित शाह खोटं बोलत असल्याचं वारंवार सांगतायत. आता अमित शाह महाराष्ट्रातल्या पुढच्या सभेत काय बोलतात याकडे लक्ष असेल.

Follow Us
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.