कुलगुरुंसोबतच्या चर्चेनंतर परीक्षा रद्दचा निर्णय, ATKT विद्यार्थ्यांना ग्रेस गुण, सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य : उदय सामंत

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली (Uday Samant on University Final Exam and UGC).

कुलगुरुंसोबतच्या चर्चेनंतर परीक्षा रद्दचा निर्णय, ATKT विद्यार्थ्यांना ग्रेस गुण, सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य : उदय सामंत
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 3:49 PM

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली (Uday Samant on University Final Exam and UGC). तसेच यावर राज्यातील 13 कुलगुरुंशी चर्चा करण्यात आल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. यावेळी उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना किती दिवस संभ्रमात ठेवायचं असाही सवाल केला. यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असंही त्यांनी नमूद केलं.

उदय सामंत म्हणाले, “अनेक लोकांनी मी यूजीसीला पत्र का लिहिलं असा प्रश्न विचारत आकांडतांडव केलं. मी 17 मे रोजीच यूजीसीला अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत चर्चा केली. मी अनेक तज्ज्ञांशीही बोललो. त्यांनी परीक्षा न घेण्याबाबतच मत नोंदवलं. यानंतर आपतकालीन समितीची देखील बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देखील यूजीसीला पत्र देण्यात आलं.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“यूजीसीने 2 ते 3 दिवसांपूर्वी पत्र पाठवत गाईडलाईन्स पाठवल्या. या गाईडलाईन्समध्ये त्यांनी परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देश दिले. याबाबत मी भूषण पटवर्धन यांची मुलाखत बघितली. त्या मुलाखतीने अजून एक संभ्रम निर्माण झाला आहे. त्या मुलाखतीत भूषण पटवर्धन यांनी पुढचं काय होणार यावर नियोजन न करता पुढे जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही निर्णय घेऊ, असं म्हटलं. यामुळे सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमात ठेवायचं असंच चित्र दिसत आहे,” असंही सावंत म्हणाले.

‘पहिल्या गाईडलाईन्समध्ये परीक्षेबाबत राज्यांना आणि कुलगुरुंना निर्णय घेण्याचे अधिकार’

उदय सामंत म्हणाले, “आमची 6 एप्रिलला बैठक झाली. या बैठकीत कोविडच्या प्रादुर्भावामुळे काय होणार आहे? याची माहिती घेण्यासाठी 13 कुलगुरुंच्या बैठकीत एक समिती स्थापन केली. भविष्यात परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत कुलगुरुंनी शासनाकडे शिफारस करावी, असं आम्ही ठरवलं. याशिवाय उपसमितीच्या बैठका देखील 23 आणि 24 एप्रिलला झाल्या. 13 कुलगुरुंच्या बैठकीत 6 जणांची उपसमिती ठरली. त्यांचे समन्वयक मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांना निवडण्यात आले.”

“या समितीने काम करायला सुरुवात केली तेव्हा 29 एप्रिलला पहिल्यांचा यूजीसीच्या गाईडलाईन्स आल्या. पहिल्याच गाईडलाईन्समध्ये प्रत्येक राज्यामध्ये असलेली कोविडची परिस्थिती पाहून तेथील शासनाने निर्णय घेण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार सरासरीने गुण द्यायचं, पुढच्या वर्षात घ्यायचं की नाही, हे विद्यापीठाने ठरवण्यास सांगण्यात आलं,” असंही सामंत म्हणाले.

हेही वाचा :

Exam Controversy | परीक्षा रद्द झाल्याच पाहिजे, मंत्री उदय सामंत यांची मागणी

UGC चा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा, सप्टेंबरपर्यंत परीक्षा शक्य नाही : उदय सामंत

Uday Samant on University Final Exam and UGC

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.