मुंबई : केंद्र सरकारने देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच आता या लसीकरणासाठी पुरेपुर नियोजन करुन पुढील काळात राज्यात लसींचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहिल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय (Uddhav Thackeray and Rajesh Tope on decision of Vaccination above 18 in India by Modi Government).