AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा, दुश्मन भाजपमध्येच प्रवेश करतील; दैनिक ‘सामना’तून बोचरी टीका

पुंछमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकं वर काढल्याने खळबळ उडाली आहे. त्यावरून दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला करण्यात आला आहे.

ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा, दुश्मन भाजपमध्येच प्रवेश करतील; दैनिक 'सामना'तून बोचरी टीका
Poonch terror attackImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 22, 2023 | 9:20 AM
Share

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाने डोकं वर काढलं आहे. पुंछमध्ये पाच जवान शहीद झाले आहेत. याबाबत 12 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हल्ल्यावरून दैनिक सामनातून केंद्रातील भाजप सरकारला घेरण्यात आलं आहे. काश्मिरातील हल्ले अजून सुरूच आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता बोलावं, असं आव्हानच दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आलं आहे. ईडी आणि सीबीआयला सीमेवर पाठवा. दुश्मन शरणागती पत्करून भाजपमध्ये प्रवेशच करतील, अशी बोचरी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.

याच अग्रलेखातून अमित शाह यांना भक्तांचे पोलादी पुरुष म्हणून डिवचले आहे. अमित शाह हे कामाच्या ओझ्याखाली दबून गेल्याचा दावाही करण्यात आला आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांना मोडून विस्कळीत करायचे आणि भाजपला लोकसभेत विजय मिळवून द्यायचा याची जबाबदारी शाह यांच्याकडेच असल्याचा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. काश्मिरात 370 कलम हटवूनही हिंसाचार थांबलेला नाही. शांतता नांदताना दिसत नाही. काश्मिरी पंडितांच्या घर वापसीचे वचनही हवेत विरले आहे. पाकिस्तानला गोळीनेच उत्तर देऊ असंही मोदी म्हणायचे. आपली छाती 56 इंचाची असल्याचं मोदी म्हणायचे. पण प्रत्यक्षात काश्मीरच्या भूमीवर, लडाख आणि अरुणाचलमध्ये उलटेच घडताना दिसत आहे, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

अतिरेकी नामक अतिथीं हल्ले करतातच कसे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपर्यंत युद्धाची भाषा बोलत होते. आता बुद्धाची भाषा बोलत आहेत. सत्य सांगायचं तर पाकिस्तानसमोर ते युद्धाची भाषा करतात. पण चीनच्या आक्रमणापुढे त्यांना बुद्ध आठवतो. भारताची संस्कृती अतिथी देवो भवची आहे. लडाख, अरुणाचलमध्ये घुसलेले आणि काश्मिरात घुसून आपल्या जवानांवर हल्ले करणारे अतिथीच आहेत असे मानावे काय? असा सवाल करतानाच देशाला मजबूत पंतप्रधान आणि कणखर गृहमंत्री लाभलेले असताना जवानांवर अतिरेकी नामक अतिथीं हल्ले करतातच कसे? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

ईडी, सीबीआय मोदींची शस्त्रे

ईडी, सीबीआय आणि आयकर ही मोदी आणि शाह यांची शस्त्रे आहेत. पण त्यांना चिनी आणि पाकिस्तानी अतिथी घाबरतात असं दिसत नाही. जम्मू-काश्मीरचे विभाजन केले. त्यांचा पूर्ण राज्याचा दर्जा काढला. चार वर्ष झाली. पण अजूनही केंद्र सरकार तिथे निवडणुका घ्यायला घाबरत आहे. निवडणुकांशिवायच राज्य करण्याचं काम सुरू आहे, अशी टीका करतानाच काल काश्मीरमध्ये हल्ला झाला. मोदी त्यावर तरी काही बोलतील का? युद्धाची भाषा नको, बुद्धाची भाषा नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा. नाही तर सीमेवर हत्यारबंद ईडी, सीबीआयला पाठवा. काय सांगावं, दुश्मन शरणागती पत्करून भाजपमध्ये प्रवेशच करतील, अशी बोचरी टीकाही करण्यात आली आहे.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?