AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बोम्मईंच्या ट्विटचा खुलासा म्हणजे जखमेवर मीठ चोळणे”; उद्धव ठाकरे यांचा सीमावादावरून सरकारवर हल्लाबोल

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यानंतर त्यांच्या ट्विटवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी खुलासा केला.

बोम्मईंच्या ट्विटचा खुलासा म्हणजे जखमेवर मीठ चोळणे; उद्धव ठाकरे यांचा सीमावादावरून सरकारवर हल्लाबोल
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 15, 2022 | 8:18 PM
Share

मुंबईः मुंबईः सीमावाद चिघळल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर आम्ही ठोस भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस या दोघांवरही जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही दिल्लीतील बैठकीतून होयला होय करुन आले असल्याची टीका केली आहे. त्यामुळे सीमावादावरून राज्यातील राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यानंतर त्यांच्या ट्विटवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी खुलासा केला.

त्यांनी खुलासा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या ट्विटचा खुलासा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यातील प्रकार असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या बैठकीत आम्ही ठाम भूमिका मांडली असंही त्यांनी सांगितले होते. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी 15 मिनिटं दिली हेच आमच्यासाठी खूप झाली असा टोलाही त्यांना लगावला आहे.

ज्या ज्यावेळी सीमावादावर चर्चा करण्यात आली आहे. त्यावेळी कर्नाटकच्याच बाजून सीमावाद चिघळवण्यात आला आहे. त्यामुळे कालच्या बैठकीला तसा काही अर्थच नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या भेटीबद्दल बोलताना सांगितले की, सीमावाद हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही गृहमंत्री अमित शहांनी या विषयावर चर्चा केली आहे.

यावरही उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, हा प्रश्न न्यायप्रविष्ठ होता तर मग बेळगावला उपराजधानीचा दर्जा का देण्यात आला. त्याच ठिकाणी हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कर्नाटकने का घेतले असा सवाल त्यांनी केला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान