AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पाणी पाजणार, भाजप नेत्याने दिले आव्हान…

मुंबई महानगरपालिकेची सत्ता गेल्या 25 वर्षात उद्धव ठाकरे यांच्याकडेच होती, या इतक्या वर्षात फक्त तिथे भ्रष्टाचार करण्यात आला.

येणाऱ्या  महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पाणी पाजणार, भाजप नेत्याने दिले आव्हान...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Nov 13, 2022 | 9:40 PM
Share

मुंबईः गेल्या 25 वर्षात उद्धव ठाकरे यांना महानगरपालिकामध्ये सत्ता देण्यात आली, मात्र मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती आहे तशीच आहे. तिथे फक्त भष्ट्राचार करण्यात आला असल्याची टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, भष्ट्राचाराचा पाडा वाचण्यासाठी या जागर सभा आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले. घाटकोपरमध्ये डोंगरावर पाणी आणि शौचालयदेखील नसल्याचे सांगत त्यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना पाणी पाजणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.

विधानसभा लोकसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांचे फोटो वापरून निवडून आले आहेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे गटाला लगवाला आहे

तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, बांद्रा पूर्व येथील सुरू करण्यात आलेल्या जागर मुंबईचा आता जागर जनतेचा झाला आहे.

मुंबईच्या गल्लीगल्लीमध्ये आमचा आवाज गेला असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मत मागण्यांसाठी जागर मुंबईचा कार्यक्रम नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिवाळीच्या अगोदर 22 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मराठी मुस्लिम कुटुंबीयांचा पाठींबा अशी बातमी दिली होती, तर भाजप मात्र कोणत्याही जाती धर्मावर मतदान मागत नाही फक्त आम्ही आमच्या कामावर मतदान मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईमध्ये किती काम केले यावर मतदान मागा मात्र रडीचा डाव सुरू केला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उध्दव ठाकरे यांच्याकडूनच मराठी-मुस्लिम असं राजकारण केले जात आहे, तर त्यामुळे हिंदूमध्ये वाद लावत असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

टिपू सुलतान हिंदूंवर आक्रमण करणारा होता. टिपू सुलतान या देशावर आक्रमण करणारा म्हणूनच आला होता. त्या टिपू सुलतानच्या नावाने उद्यान झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये केली जात होती असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राहुल गांधींच्या यात्रेत आदित्य ठाकरे यांचा हातात हात घालून प्रचार केला जात आहे. राममंदिरवेळी याच राहुल गांधी यांनी कोर्टात राम कधी जन्मलाच नाही.

रामाची कुठली गादीच नव्हती. रामाचा कुठला इतिहास नव्हता, भगवान राम ही कल्प कल्पित कल्पना आहे या काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते याचीही त्यांनी आठवण करुन दिली. मालवणीमधील टिपू सुलतान मैदान नाव दिले आहे. हा वाद पुन्हा सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...