AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भातखळकरांच्या आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : राष्ट्रवादी

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या अतुल भातखळकर यांच्या आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांचा समाचार घेतला.

भातखळकरांच्या आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : राष्ट्रवादी
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 6:41 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या अतुल भातखळकर यांच्या तथ्यहिन आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. (We just ignores Atul Bhatkhalkar’s allegations : NCP leader Mahesh Tapase)

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशभरात वाढणारी लोकप्रियता लक्षात घेऊन व देशपातळीवरील नेतृत्व खासदार शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप करुन अतुल भातखळकर स्वतःची फालतू प्रसिद्धी करुन घेत असल्याचा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे. जनआशिर्वाद यात्रा कोरोना काळात घेणं हे चुकीचं आहे परंतु नैतिकतेचे भान विसरलेली भाजप जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि इतर सर्वांनी मोठं कार्य केले आहे तेच भाजपला बघवत नाही आणि म्हणूनच राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

ही तर ‘जन छळवणूक यात्रा’; किशोरी पेडणेकरांकडून जन आशीर्वाद रॅलीची खिल्ली

भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रॅलीची खिल्ली उडवली आहे. ही जन आशीर्वाद रॅली नाही तर जन छळवणूक रॅली आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या रॅलीची खिल्ली उडवली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ही खोचक टीका केली आहे. कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. पण जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे. त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाहीत. ही कसली जन आशीर्वाद यात्रा? ही तर जन छळवणूक यात्रा आहे, अशी खोचक टीका महापौर पेडणेकर यांनी केली आहे.

विरोधकांचं मीठ आळणी

एका वृत्तसंस्थेने देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात टॉप फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. त्यावर महापौरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले. ही विरोधकांना जबरदस्त चपराक आहे. काम केलं म्हणून ते नंबर पाचमध्ये आले. विरोधकांचं मीठ आळणीच राहिलं आहे, अशी टीका त्यांनी केली. मातोश्रीने करून दाखवलं. त्यामुळे मातोश्री टार्गेट राहणारच, पण विरोधकांनी मातोश्रीकडे लक्ष न देता, लसीकरणाकडे द्यावे. तसंही आम्हाला कुणी टार्गेट केलं तरी काही फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

इतर बातम्या

गायकवाड-राज समर्थकांमध्ये ‘इतिहासा’वरून शाब्दिक राडा; गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देण्याचा इशारा

ठाण्याच्या कोविड रुग्णालयाने 500 कर्मचाऱ्यांना अचानक काढलं; दरेकरांचा रुग्णालय चालू न देण्याचा इशारा

औरंगाबादमध्ये उद्योजकांवरील हल्ले गंभीर, फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवा; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

(We just ignores Atul Bhatkhalkar’s allegations : NCP leader Mahesh Tapase)

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.