कोव्हिडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न, त्याला तोंड देऊ शकलो नाही तर मोठे संकट निर्माण होईल: मुख्यमंत्री

कोव्हिडनंतर राज्यासह देशात रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न निर्माण होईल. या अस्वस्थेला तोंड देऊ शकलो नाही तर फार मोठे संकट निर्माण होईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

कोव्हिडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न, त्याला तोंड देऊ शकलो नाही तर मोठे संकट निर्माण होईल: मुख्यमंत्री
CM Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 4:04 PM

मुंबई : देशासह राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दुसऱ्या बाजूला शासन मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. त्यामुळे लवकरच आपण कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊ, अशा आशा निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, कोव्हिडनंतर राज्यासह देशात रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न निर्माण होईल. या अस्वस्थेला तोंड देऊ शकलो नाही तर फार मोठे संकट निर्माण होईल, असं सूचक प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ या कार्यक्रमात बोलताना हा सूचक इशारा दिला. (We’ll face Big financial problem after Covid-19, if we can’t face it, there will be a big crisis : CM Uddhav Thackeray)

संकट पूर्णपणे गेलं नाही

अजूनही थोडे दिवस थांबलं पाहिजे. कोरोनाचं संकट खरंच गेलं का? पूर्ण गेलेलं नाही. थोडसं आहे. काही काही तर जुने व्हायरस परत आलेत. ते पण दिसतंय, जुने व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट्स त्याच्यात आणत आहेत. त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. या जुन्या आणि नव्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, असा इशारा त्यांनी दिला. काहीजण म्हणतील हे उघड केलं, ते उघडं का करत नाही. काही दिवस थांबा. टप्प्याटप्प्याने आपल्याला सर्व उघडं करायचं आहे. एक दिवस हळूवारपणाने मास्कही काढायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तर देशातच नाही तर जगात अस्वस्थता माजेल

सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना येथे बोलवा. त्यांना लोकांच्या रोजीरोटीसाठी काय करणार हे विचारा. सामान्य नागरिकांना रोजीरोटी मिळाली नाही तर देशात नाही तर जगात अस्वस्थता माजेल. हे होऊ नये म्हणून पुढच्या काळात उद्योग, उद्योजकांची महाराष्ट्राला खूप गरज आहे. ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे ही महत्वाचे आहे. उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे, पण समतोल साधत आपल्याला पुढे जायचे आहे. या सुविधा देतांना राज्याचा समतोल बिघडता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. उद्योजक, सर्वसामान्य नागरिक आणि सगळ्या घटकांकडे मला मुख्यमंत्री म्हणून समान लक्ष द्यायचे आहे. अर्थचक्र सुरु राहण्यासाठी उद्योग सुरु राहणे महत्वाचे आहे. हे आपण का करतो तर दोन घास शांततेने खाण्यास मिळण्यासाठी. त्या शेतकऱ्यांना जपणे ही शासनाची जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

  • कोरोना किती दिवस चालेल माहीत. पण या वातावरणात आपले जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, यास आपण सहकार्य करत आहात ही खूप मोठी गोष्ट.
  • समजुती काही वेळा भ्रामक काही वेळा खऱ्या असतात. कोरोनामुळे काही गोष्टी काही दिवसांसाठी बंद कराव्या लागल्या. आता आपण हळूहळू काही गोष्टी सुरु करत आहोत. संपूर्ण जगाचे पॉझचे बटन सध्या दाबलेले आहे अशी आजची स्थिती आहे.
  • एकेकाळी लहान मुलांचा खेळ होता ‘स्टॅच्यू’… तसं काहीसे कोरोनाने केले आहे. पण हा काळ मागे वळून पहाण्याचा आहे. आपण काय केलं?, काय करायचे होते आणि काय केले पाहिजे… हे धोरण ठरवणे, दिशा ठरवणे यासाठी हा काळ महत्वाचा आहे.
  • आपण सकारात्मक वातावरणाने सुरुवात केली. अगदी सुरुवातीलाच अनेक उद्योजकांना आपण सह्याद्री अतिथीगृहात भेटलो. देशातील दिग्गज मंडळी तिथे आली होती. देशातील प्रमुख चेहरे महाराष्ट्रासोबत असल्याचा हा खूप मोठा दिलासा होता.
  • आपल्याला आपला मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे… पण त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. आता आपण संयम ठेऊन शिस्तीने वागलो तरच आपल्याला कायमसाठी आपला मास्क उतरवता येणार आहे.
  • विकासाबरोबर पर्यावरणाकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. आपल्यामुळे पर्यावरणाला धक्का लागणार नाही एवढी जरी आपण काळजी घेतली तरी खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटते.
  • राज्याचा एक मॅप करू जो राज्यात कोणत्या भागात कोणत्या उद्योगांची सुरुवात करता येईल हे सांगेल. एकदा हे निश्चित झाले तर त्याला लागणाऱ्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकू
  • इतर राज्यातील मुख्यमंत्री इकडे महाराष्ट्रात येतात आणि आम्ही आमच्या राज्यात काय देतो हे सांगून त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्यास सांगतात. ते ऐकल्यावर काही जण तिकडे जातातही. पण अनेकजण इथेच आपल्या महाराष्ट्रात राहातात.
  • उद्योजक होणे म्हणजे स्वत: एकट्याची सुबत्ता मिळवणे नाही. तर इतरांनाही सोबत घेऊन त्यांच्या आयुष्यात सुबत्ता देणारे आपण आहोत असे सांगणारा वर्ग आहे.
  • या मधल्या काळात अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न आपण सुरु केला आहे. आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळेच सुरु करायचे आहे.
  • आपल्याला आपला मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे… पण त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. आता आपण संयम ठेऊन शिस्तीने वागलो तरच आपल्याला कायमसाठी आपला मास्क उतरवता येणार आहे.
  • सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना येथे बोलवा. त्यांना लोकांच्या रोजीरोटीसाठी काय करणार हे विचारा.
  • सामान्य नागरिकांना रोजीरोटी मिळाली नाही तर देशात नाही तर जगात अस्वस्थता माजेल. हे होऊ नये म्हणून पुढच्या काळात उद्योग, उद्योजकांची महाराष्ट्राला खूप गरज. ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे ही महत्वाचे आहे.
  • उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे पण समतोल साधत आपल्याला पुढे जायचे आहे. या सुविधा देतांना राज्याचा समतोल बिघडता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, उद्योजक, सर्वसामान्य नागरिक आणि सगळ्या घटकांकडे मला मुख्यमंत्री म्हणून समान लक्ष द्यायचे आहे.
  • अर्थचक्र सुरु राहण्यासाठी उद्योग सुरु राहणे महत्वाचे आहे. हे आपण का करतो तर दोन घास शांततेने खाण्यास मिळण्यासाठी. त्या शेतकऱ्यांना जपणे ही शासनाची जबाबदारी आहे.
  • पर्यटनातून रोजगार वाढतो म्हणून आपण या क्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा लाभला, पुरातन मंदिरे महाराष्ट्रात आहेत, गडकिल्ले आहेत, जंगले आहेत. पण आपण अजूनपर्यंत पर्यटनाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही. या क्षेत्राकडे गांभीर्याने बघितलेलेच नाही.
  • काळाप्रमाणे रोजगाराची अनेक क्षेत्र उदयाला येत आहेत त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
  • विकासाबरोबर पर्यावरणाकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. आपल्यामुळे पर्यावरणाला धक्का लागणार नाही एवढी जरी आपण काळजी घेतली तरी खुप मोठी गोष्ट आहे असं मला वाटते.
  • कोविडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न होईल. या अस्वस्थेला तोंड देऊ शकलो नाही तर फार मोठे संकट निर्माण होईल.
  • इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात गुंतवणूकीचे आवाहन करतात ही वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर येऊ नये, असे मला वाटते, कारण माझ्या महाराष्ट्रातील उद्योजकच महाराष्ट्राचे ब्रॅण्ड व्हावेत.

संबंधित बातम्या:

करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा

भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही; नवाब मलिकांनी सुनावले

भाजपचा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध, मग कोणती पद्धत हवी?; गिरीश बापटांनी केलं मोठं विधान

(We’ll face Big financial problem after Covid-19, if we can’t face it, there will be a big crisis : CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.