AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम रेल्वेचा नवीन मार्ग, 200 लोकलच्या फेऱ्या वाढणार, उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा

Mumbai Local New Routes: डहाणू विरार रेल्वेचे सुरू असलेल्या चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी मागील आठवडाभरापासून जोर धरू लागली होती. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने या चौपदरीकरणाबाबत डेडलाईन जाहीर केली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेचा नवीन मार्ग, 200 लोकलच्या फेऱ्या वाढणार, उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा
mumbai local प्रातिनिधिक फोटो
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 17, 2025 | 2:24 PM
Share

Mumbai Local New Routes: मुंबईकरांचा प्रवासासाठी सर्वात महत्वाचे साधन उपनगरीय रेल्वे आहे. रेल्वेकडून अनेक लोकल सुरु असताना प्रवाशांची गर्दी कमी होत नाही. त्यामुळे लोकलसोबत मेट्रो सेवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच लोकलचे नवनवीन मार्ग तयार करुन फेऱ्या वाढवल्या जात आहेत. मध्य रेल्वेचा उपनगरीय लोकलचा विस्तार कर्जत, कसारापर्यंत झाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेचे विस्ताराचे काम सुरु असते. आता पश्चिम रेल्वे डहाणू ते विरार मार्गाचे चौपदरीकरण करणार आहे. हा मार्ग 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे 200 लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत.

चौपदरीकरणाचे काम 35 टक्के पूर्ण

पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वेचे सुरू असलेल्या चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण करणार होणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वे कडून करण्यात आला आहे. सध्या या चौपदरीकरणाचे काम 35 टक्के पूर्ण झाले असून भूसंपादनाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. डहाणू विरार पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणाचा काम पूर्ण झाल्यानंतर नव्या मार्गिकेमुळे तब्बल दोनशे लोकल फेऱ्या वाढणार असल्याची माहिती देखील पश्चिम रेल्वे कडून देण्यात आली.

नवीन मार्गिकामुळे होणार फायदा

लोकलच्या या वाढलेल्या फेऱ्यांमुळे डहाणूपर्यंत प्रवास करणाऱ्या उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल . सध्या डहाणूपर्यंतच्या धावणाऱ्या लोकलच्या फेरा अत्यल्प असल्याने येथील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यातच एक्सप्रेस आणि मालवाहू गाड्यांमुळे अनेक वेळा लोकलला अनेक रेल्वे स्थानकांवर थांबा दिला जातो. यामुळे लोकल नेहमीच मुंबईत उशिरा पोहोचतात. त्यामुळे अनेक नोकरवर्ग आणि विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो. परंतु आता नवीन मार्ग सुरु झाल्यामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे.

डहाणू विरार रेल्वेचे सुरू असलेल्या चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी मागील आठवडाभरापासून जोर धरू लागली होती. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने या चौपदरीकरणाबाबत डेडलाईन जाहीर केली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ