AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Update | Good News, लवकरच मुंबईला पाणी पुरवठा करणार दुसरा तलाव ओसांडून वाहणार

Mumbai Rain | सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये काय स्थिती आहे? मुंबईच्या तलावात सध्या किती दिवस पुरले इतका पाणीसाठा आहे?. नक्कीच मुंबई BMC च टेन्शन थोडं कमी होईल.

Mumbai Rain Update | Good News, लवकरच मुंबईला पाणी पुरवठा करणार दुसरा तलाव ओसांडून वाहणार
Image Credit source: PTI
| Edited By: | Updated on: Jul 23, 2023 | 8:56 AM
Share

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मागच्या दोन-चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. तलाव, नदी, नाले, धरणं दुथडी भरुन वाहू लागली आहेत. या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. पण आता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरण सुद्धा भरुन वाहू लागली आहेत. देशाच अर्थकारण मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्याने सर्वांचीच चिंता वाढलेली. आता जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक सुखावले आहेत.

मुंबईला किती धरणातून पाणी पुरवठा होतो?

शेतकरी वर्गाप्रमाणेच शहरात राहणाऱ्या नागरिकांची चिंताही पावसाने वाढवली होती. कारण धरण क्षेत्रात चांगला पाऊस होणं गरजेच आहे. अन्यथा शहारतील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागतो. संपूर्ण मुंबईला एकूण सात धरणातून पाणी पुरवठा होतो. तानसा, मोडक सागर, तुलसी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो.

मुंबईला पाणी पुरवठा करणारं दुसर धरण कुठलं भरणार?

सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव 100 टक्के भरला आहे. लवकर दुसरा तलाव तानसा भरुन वाहण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरु आहे. पावसामुळे धरण भरून वाहण्याची शक्यता आहे.

सध्या किती आहे पाणी पातळी?

तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी 126.602 मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे. लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, अशी सूचनाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आल्या आहेत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.