AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले?; उद्धव ठाकरे यांनी यादीच वाचली

भाजपने लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर गंभीर आरोप विरोधकांवरल केला. भाजप संविधानामध्ये बदल करणार असल्याचं विरोधकांनी नरेटिव्ह सेट करणार असल्याचं म्हटलं होतं. याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले?; उद्धव ठाकरे यांनी यादीच वाचली
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 15, 2024 | 4:22 PM
Share

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळवता आलं नाही. भाजपने विरोधकांवर संविधान बदलणार असल्याचं चुकीचा नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप केला आणि याचाच फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसल्याचं सांगितंल. यावर महाविकास आघाडीमधील उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले यांची वादी वाचून दाखवली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

इंडिया आघाडीला मते दिलं तर तुमची संपत्ती मुस्लिमांना देतील, हे नरेटिव्ह होतं. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या शेतातील म्हैस चोरून नेतील. यांचं सरकार आलं तर नळ कापून नेतील, मंगळसूत्र हे खरं नरेटिव्ह होतं. मी सत्तेत आल्यावर उद्योगधंदे वाढवेन, हा नरेटिव्ह नव्हता का. नकली संतान हे नरेटीव्ह नव्हतं का? असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

वोट जिहाद म्हणजे काय? मोदी म्हणतात त्यांचे बालपण मुस्लिम कुटुंबात गेलं. ईदमध्ये शेजारच्या मुस्लिम कुटुंबाच्या घरात ताजिया खायचे. त्या खालेल्या मीठाला ते जागले की नाही. मोदींनी सांगावं त्या मिठाला जागले की नाही. व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये मीठ टाकतात. तेही जेवण ते जेवले की नाही ते सांगावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो. 23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये म्हटलं भाजप मुक्त राम पाहिजे. अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे. तिथे भाजपचा पराभव झालाय. भाजपमुक्त राम झाला आहे. त्यांना समजायला पाहिजे होतं. संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. कसंबसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलं. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत