मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ कामासाठी बेस्टची WHO कडून दखल

कोरोना काळात केलेल्या कामासाठी थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून बेस्टची दखल घेण्यात आलीय. त्यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे.

मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'या' कामासाठी बेस्टची WHO कडून दखल
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 8:04 PM

मुंबई : कोरोना काळात केलेल्या कामासाठी थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून बेस्टची दखल घेण्यात आलीय. त्यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल (एम.डी.) यांना जागतिक आरोग्य संघटनेने कोविड मुक्त मोहिमेसाठी बाह्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून आमंत्रित केलंय. बेस्टच्या या सामुदायिक कार्याची दखल यापूर्वी जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही घेतली होती (WHO invite Mumbai Best chief medical officer for his Covid work).

जागतिक आरोग्य संघटना (WHO), जी-20 (G-20 leader country), युरोपीयन युनियन (European Commission), फिंड (FIND), मेलिंडा अँड बिल गेट फाऊंडेशन (Melinda & Bill Gate foundation) यांनी एक मोहिम सुरू केलीय. यात The Access to Covid-19 Tools Accelerator(ACT-A) या मोहिमेअंतर्गत तात्काळ अॅंटिजेन टेस्टद्वारे कोविड मुक्तीचं काम हाती घेण्यात आलंय. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल (एम.डी.) यांना बाह्य तज्ञ सल्लागार 28 जून 2021 रोजी आमंत्रित केलं आहे.

“कार्यक्षम सेवेची अखंड परंपरा” या ब्रीदवाक्याला अनुसरून कोविड टाळेबंदी काळात इतर सर्व वाहतूक सेवा बंद असताना बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता पालघर, आसनगाव, बदलापूर, पनवेल पर्यंत आपल्या बसगाड्यांद्वारे वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच बेस्टच्या वीज कर्मचाऱ्यांनी देखील न घाबरता नवीन कोविड सेंटरला त्वरित वीज पुरवठा उपलब्ध करून दिला आणि युद्धपातळीवर कोविड हॉस्पिटल व संसर्गजन्य विभागात वीजपुरवठा पुनर्स्थापित करून दिला. म्हणूनच कोविड महामारीत बेस्ट मुंबईची मुख्य लाईफ लाईन म्हणून उदयास आली आहे.

कर्मचाऱ्यांना कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बेस्टने केलेल्या उपाययोजना

  • सहविकृतीग्रस्त, दिव्यांग व कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्यात आली
  • 10 हजार पेक्षा जास्त जनजागृती अभियानांच्या मदतीने कर्मचाऱ्यांमध्ये कोविड प्रतिबंध दक्षतेची अंमलबजावणी केली
  • कर्मचाऱ्यांना लागणारी सॅनिटाइजर, मास्क, हॅंडग्लोव्ज यासारखी वैयक्तिक संरक्षणाची साधने उपलब्ध करून दिली.
  • कोविडचे तत्पर निदान करण्यासाठी 25 हजार कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी व 18 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बस आगारात तात्काळ अॅंटिजेन चाचण्या करण्यात आल्या
  • “तुम्ही कसे आहात? ” या मोहिमेअंतर्गत कोविड संसर्गबाधित कर्मचाऱ्यांशी दररोज दोन वेळा दूरध्वनीद्वारे संवाद साधून गरज भासल्यास त्यांना कोविड सेंटर/ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात पुढाकार घेतला
  • सुरळीत लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत 80 टक्के कर्मचाऱ्यांनी प्रथम मात्रा व 60 टक्के पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्राही घेतलेली आहे.

अशा उपाययोजनांमुळे संपूर्ण मुंबई कोविडमुळे अतिबाधित झाली असताना देखील पहिल्या लाटेत 2900 व दुसऱ्या लाटेमध्ये केवळ 565 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

हेही वाचा :

मुंबई, ठाणे आणि रायगडमधील नागरिकांचा वीज बिल भरण्यास नकार; 693.99 कोटींचे बिल थकीत

ट्राम आली रे… मुंबईकरांना ब्रिटिशकालीन ट्राम पाहता येणार, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईकरांच्या खिशाला कात्री? वीज बिलामध्ये 50 रुपयांच्या वाढीचा शॉक?

व्हिडीओ पाहा :

WHO invite Mumbai Best chief medical officer for his Covid work

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.