AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडी आणि राहुल गांधींसमोर शरद पवारांनी भाषणामध्ये निवडणूक आयोगाचे का मानले आभार?

मुंबईमधील शिवाजी पार्कवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारतो जोडो न्याय यात्रेची सांगता होत आहे. इंडिया आघाडीमधील मोठे नेते उपस्थित आहेत. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगाचे आभार मानले.

इंडिया आघाडी आणि राहुल गांधींसमोर शरद पवारांनी भाषणामध्ये निवडणूक आयोगाचे का मानले आभार?
| Updated on: Mar 17, 2024 | 8:50 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारता जोडो न्याय यात्रेचा सांगता सभा सुरू आहे. या सभेमध्ये इंडिया आघाडीमधील पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये निवडणूक आयोगाचे आभार मानले. शरद पवार यांनी नेमके कोणत्या कारणामुळे निवडणूक आयोगाचे आभार मानले जाणून घ्या.

देशाची आज जी अवस्था आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे. आपण सर्व मिळून हा बदल घडवून आणू शकतो. ज्या लोकांनी देशाला वेगवेगळी आश्वासने देऊन फसवलं. त्यांना दूर करण्यासाठी आपल्याला मतदानातून बाहेर करावं लागलं. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी देशावासियांना अनेक आश्वासने दिले होते. शेतकरी, दलित, महिला, आदिवासी आणि सर्वांना आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाही. जे लोक आश्वासने देतात पण पूर्ण करत नाही, त्यांना दूर केलं पाहिजे. पुढच्या महिन्यात आपल्याला ती संधी मिळाली असल्याचं शरद पवार म्हणाले.

टीव्हीवर आपण एक खोटी गोष्ट ऐकली आहे. मोदींची गॅरंटी, ही गॅरंटी चालणारी नाही. खोटं आश्वासन देऊ त्यांनी आपल्याला वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला. पण आजपासून टीव्हीवर ही गॅरंटी दिसणार नाही. कारण निवडणूक आयोगाने ती रोखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानत आहोत. 42 मध्ये महात्मा गांधी यांनी छोडो भारत, छोडो हुकूमतचा नारा दिला होता. आता याच शहरात छोडो भाजप आणि भाजपसे मुक्ती असा नारा देत निर्धार केला पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्यावर आचार संहितेचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.