AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atul Bhatkhalkar on Nawab Malik: दाऊदचा माणूस तरीही मंत्रिमंडळात, भातखळकरांनी सांगितली दोन कारणं

Atul Bhatkhalkar: नवाब हा दाऊदचा माणूस आहे. तरीही तो मंत्रिमंडळात आहे. याची दोन महत्वाची कारण म्हणजे पवार आणि ठाकरे... असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

Atul Bhatkhalkar on Nawab Malik: दाऊदचा माणूस तरीही मंत्रिमंडळात, भातखळकरांनी सांगितली दोन कारणं
दाऊदचा माणूस तरीही मंत्रिमंडळात, भातखळकरांनी सांगितली दोन कारणंImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 21, 2022 | 12:55 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांचे दाऊदशी संबंध असल्याचं आणि मनी लाँडरिंगप्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे. त्यानंतर भाजपकडून आघाडी सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. नवाब मलिक हेच दाऊद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आता त्यावर बोललं पाहिजे. शरद पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं पाहिजे. दाऊदचा माणूस असल्याचं सिद्ध झाल्यानंतरही मलिकांना मंत्रिमंडळात का ठेवलं? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरलं आहे. दाऊदचा माणूस तरीही मंत्रिमंडळात कसा? असा सवालच अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. भातखळकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. त्यामुळे आता मलिकांना मंत्रिमंडळात ठेवलं जाणार की त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवाब हा दाऊदचा माणूस आहे. तरीही तो मंत्रिमंडळात आहे. याची दोन महत्वाची कारण म्हणजे पवार आणि ठाकरे… असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी का केली जात नाही, असा सवालच भातखळकर यांना या ट्विटमधून ठाकरे सरकारला विचारायचं आहे.

ईडीची सत्यता धोक्यात

दरम्यान, काँग्रेस नेते भाई जगताप यांनी या प्रकरणावर बोलणं टाळलं आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्यामुळं मला बोलता येणार नाही. मात्र ईडीची सत्यता धोक्यात आली आहे. हंदी काढणाऱ्यांच्या घरी ही आता ईडी जात आहे, अशी टीका भाई जगताप यांनी केली आहे.

मुंडेंचे कानावर हात

मलिक यांच्याबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाची आपल्याला माहिती नसल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कानावर हात ठेवले आहेत. नवाब मलिकांबाबत कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले याबाबत मला काहीही माहिती नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. माहिती घेऊनच या प्रकरणावर बोलतो, असंही त्यांनी सांगितलं.

मलिक हेच दाऊद

नवाब मलिक हे दाऊद गँगचे सदस्य आहेत हे सिद्ध झाले आहे. जेलमध्ये गेल्या नंतर नवाब मलिक यांना मंत्री कायम ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पण दाऊदशी संबंध आहेत का? या बाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टता करावी. उद्धव ठाकरे यांचे पिताजी बाळासाहेब ठाकरे यांनी हजार वेळा सांगितलं असेल की शरद पवार आणि दाऊदचे संबंध आहेत .मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची पार्टनरशिप केली. गोवावाला कंपाऊंडमध्ये जे आर्थिक व्यवहार झाले, करोडो रुपयाची प्रॉपर्टी काही लाखात नवाब मलिक यांना कशी काय मिळाली. मलिक हेच दाऊद आहेत. तरी ते मंत्रिमंडळात कसे? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?