AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहेरच्या लोकांना आम्ही का कडेवर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रात वाढत चाललेल्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यावर कोणाचंच नियंत्रण नाहीये. फक्त मतांसाठी राजकारण सुरु आहे. शहरांची वाट लागली आहे. पैसा हा फक्त बाहेरुन येणाऱ्या लोकांना सुविधा पुरवण्यासाठी खर्च केला जात आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

बाहेरच्या लोकांना आम्ही का कडेवर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 21, 2024 | 8:37 PM
Share

वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय हे त्यांनी पुन्हा एकदा लक्षात आणून दिलं. राज ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे डेव्हल्पमेंट प्लान होतं. पण टाऊन प्लानिंग होत नाही. आपल्याकडे किती लोकसंख्या वाढणार, तेवढे रस्ते आहे का, कॉलेज, ‘हॉस्पिटल येणार का, मार्केट येणार आहे का, थिएटर येणार का याचा विचार केला जात नाही. आम्ही त्याचा विचार करत नाही. आपण फक्त स्क्वेअर फुटात अडकलोय. राहिल्या आल्यानंतर जगायचं कसं याचे प्रश्न विचारतो का. आम्हीच प्रश्न विचारत नाही. तुमची स्वतची हक्काची जमीन समोरच्याला देत असताना तुम्ही प्रश्न विचारत नाही. हेच त्यांना हवं असतं. बिल्डर सारख्या औलादींना हवं असतं. तुमच्यात जेवढी फुट पडेल तेवढं त्यांना हवंच असतं. राजकारणी आहेच बसलेले. तुम्ही एकत्र राहणं, विचार करणं गरजेचं आहे. एकमुखाने विचार करून बोलणं महत्त्वाचं आहे. तर हाताला काही गोष्टी लागतील.’

‘प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. लाल बस ही मुंबईची ओळख होती. आज कोणत्याही शहराला कॅरेक्टर उरलेलं नाही. सगळीकडे फ्लायओव्हक आणि ब्रिज होताय. पण हे कोणासाठी आणि का होतंय. माणसं वाढायला लागलीये. बाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहेत. मुंबई वाढत जातेय. त्यामुळे त्यांना सुविधा देण्यासाठी पैसा खर्च होतोय. मुळ जिथे खर्च व्हायला पाहिजे तिथे न होता पैसा खर्च होतोय.’

‘ठाणे जिल्ह्यात बाहेरचे लोकं येत आहेत. एकाच जिल्ह्यात आठ महापालिका आहे. बाहेरच्या लोकांनी आम्ही का कड्यावर घ्यायचं. राजकारणात कशाला मग यायचं. मुळ गोष्टीकडे कोणाचं लक्षच जात नाही. बदलापूरमधील घटना आपल्याच लोकांनी बाहेर काढलं. नाहीतर बाहेरपण आलं नसतं. दरवर्षी या महाराष्ट्रात ३ ते ४ हजार बलात्कार होत आहेत. हा सरकारी आकडा सांगतोय. यावर इलाज कोणी शोधायला तयार नाही. फक्त टीका करायच्या. शाळेत लहान मुली पाठवायच्या आणि असे प्रकार घडणार.’

Follow Us
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!