AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विलेपार्लेतील जैन मंदिर पुन्हा बांधणार? आता पुढचं पाऊल काय? वॉर्ड अधिकार्‍याच्या त्या आश्वासनानं जैन समाजाचं झालं का समाधान?

Vile Parle Jain Temple : मुंबईमधील विलेपार्लेतील 35 वर्ष जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बुधवारी मुंबई महापालिकेने पाडले. त्यानंतर जैन समाज नाराज झाला. त्यांनी आज या कारवाईविरोधात आवाज उठवला. त्यानंतर आता पालिकेच्या वॉर्ड अधिकार्‍याचा मोठा खुलासा समोर आला आहे.

विलेपार्लेतील जैन मंदिर पुन्हा बांधणार? आता पुढचं पाऊल काय? वॉर्ड अधिकार्‍याच्या त्या आश्वासनानं जैन समाजाचं झालं का समाधान?
विलेपार्ले जैन मंदिरImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 19, 2025 | 3:41 PM
Share

मुंबईमधील विलेपार्ले परिसरातील कांबळीवाडी येथील 35 वर्ष जुने पार्श्वनाथ जैन मंदिर बुधवारी पाडण्यात आले. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. या कारवाईमागील कारणही स्पष्ट झाले. त्यानंतर देशभरातील जैन समुदाय नाराज झाला. मंदिर पाडल्याच्या विरोधात आज, शनिवारी सकाळी निषेध अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव, संत आणि राजकीय मंडळी सहभागी झाली होती.

काँग्रेस खासदार आक्रमक

इतके जुने जैन मंदिर पाडण्यावरून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधला. “त्यांची मागणी काय आहे? ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली, त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. ही मागणी योग्य आहे. सकाळी दोन जेसीबी आणले, महिलांवर हल्ला झाला. याचा सगळेजण निषेध करतायत. जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे. आजपर्यंत त्यांचा कधी आवाज ऐकला होता का? आज का उतरावं लागलं त्यांना?” असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारला.

चुकीच्या पद्धतीने मंदिर पाडण्यात आल आहे. त्यामुळे जैन मंदिर जिथे होत त्याच ठिकाणी बांधून देण्यात यावं. हे हिंदुत्ववादी सरकार आहे ना? मग मंदिर कसे तोडले जात आहेत हा सवाल आहे? तुमची सत्ता सगळीकडे आणि कारवाई मात्र मंदिरावर डबल इंजिनच्या सरकारने ही मंदिरावरील तोडक कारवाई केली आहे, असे त्या म्हणाल्या.

भव्य मंदिर उभारणार

दरम्यान या सर्व घटनेनंतर शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी पुढील घडामोडींची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली या बैठकीत ठरलं की,ज्या ठिकाणी मंदिर होत त्या ठिकाणी साफसफाई करण्यात येईल आणि मूर्तीची स्थापना करून पूजा करण्यात येईल. ज्या हॉटेल मालकीच्या दबावाखाली हे मंदिर तोडण्यात आल आहे त्या हॉटेल मालकच्या अनधिकृत बांधकामाला नोटीस देण्यात येणार आहे. तर यापूर्वी जिथं मंदिर होतं, तिथं पुन्हा त्याच दिमाखात बांधलं जाईल, अशी माहिती आमदार पटेल यांनी वॉर्ड अधिकाऱ्याशी झालेल्या बैठकीनंतर दिली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.