AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?

Sanjay Raut Big Statements : राज्यात पुन्हा एकदा वारं फिरलं आहे. मराठी माणूस, मराठी भाषा अजेंड्यावर आली आहे. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या वार्तांनी आज माध्यमं व्यापली आहेत. त्यावर काय म्हणाले संजय राऊत?

आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?
राज ठाकरे उद्धव ठाकरे मनोमिलन होणार?Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 19, 2025 | 3:30 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा वारं पालटलं आहे. गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी दोन्ही नेतृत्वाने एकत्र येण्याविषयी चाचपणी केली होती. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याविषयी त्यांनी मार्ग खुला असल्याचे मतं मांडलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अटी-शर्तींआधारे एकत्र येण्याची हाळ दिली. त्यानंतर याविषयी उद्धव ठाकरे गटाची भूमिका खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली.

अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेची मनसेविषयीची भूमिका काय यावर भाष्य केले. त्यांनी भाजपावर निशाणा साधताना मनसेसोबतच्या मनोमिलनावर कटाक्ष टाकला.

लोकसभा, विधानसभेवेळी आमची भूमिका होती. याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारे मदत होईल अशी भूमिका घेऊ नये. आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. ही भूमिका आमची आजही आहे. उद्धव ठाकरे यांनी नम्रपणे सांगितलं आहे, आजही अशा शक्ती आहेत, ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थान सुरू आहेत. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही. अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही. अशी भूमिका घेणं सर्वांनी गरजेचं आहे. महाराष्ट्राचे शत्रू, शिवाजी महाराजांचे शत्रू, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे. त्यानंतर आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं म्हणणं सांगू, असे मत संजय राऊत यांनी मांडले.

महाराष्ट्राबाबत सध्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात एक. अशा महाराष्ट्र शत्रूंना घरात थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे. याच भूमिकेचा पुरस्कार राज ठाकरे किंवा त्यांच्या पदाधिकार्‍यांनी करायला पाहिजे. भाजपचे बगलबच्चे शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व नष्ट करायचं आहे. त्यांना ठाकरे या नावाचं अस्तित्वच मिटवायचं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सध्या वेट अँड वॉचची भूमिका

राज ठाकरे छत्रपती शिवरायांसमोर उद्धव ठाकरे यांच्या अटी आणि शर्तींच्या अनुषंगाने वचन देत असतील पुढील विचार करता येईल असे संकेत संजय राऊत यांनी दिले. जर दोन्ही प्रमुख ठाकऱ्यांनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करत आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतल्यावर आम्ही प्रतिक्षा करू. वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू, असे राऊतांनी स्पष्ट केले. आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्यांकडे पाहत आहोत. हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे, असे राऊत म्हणाले.

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?