AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात करणार आंदोलन, जंगलाच्या शेजारील आंदोलन कसं असणार?

जंगलाच्या शेजारी एक शेत निवडलं आहे. जे लोकं पाल टाकून राहतात त्यांच्यासोबत मी राहणार आहे. तिथून येणं-जाणं करून अधिवेशन करू.

बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात करणार आंदोलन, जंगलाच्या शेजारील आंदोलन कसं असणार?
बच्चू कडू
| Edited By: | Updated on: Dec 26, 2022 | 8:15 PM
Share

नागपूर : आमदार बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात आंदोलन करणार आहे. बच्चू कडू म्हणाले, स्वातंत्र्याला ७० वर्षे झालीत. अन्न, वस्त्र व निवारा असा घटनेचा सार होता. प्रत्येकाला अन्न मिळावं, वस्त्र मिळावं तसंच घर मिळावं असं अपेक्षित होतं. आमदार, खासदार, बिल्डर यांचे घर एक नाही दहा-दहा व्हायला लागलेत. सामान्य माणसाचं घरं जसच्या तसंच आहे. केंद्र सरकारनं २०२२ मध्ये सर्वांना घर अशी घोषणा केली. काही लोकं अजूनही मातीच्या घरातही राहू शकत नाही. वर्षानुवर्ष पालीत राहतात. कुठूनं पाणी येणार. आयुष्य कसं जाणार. इकडं स्टटी रुम असतं. तिकडं शिक्षण नाही. जेवढ्या आमच्या बाथरूमा असतात, तेवढं त्यांचं घर नसतं. ही तफावत आहे. यासाठी लक्ष वेधण्यात येणार आहे.

ही मागणी घेऊन हे आंदोलन राहणार आहे. शहरात पंतप्रधान आवास योजनेचे अडीच लाख रुपये मिळतात. दुसरीकडं गावात एक लाख १८ हजार रुपये मिळतात. एवढी तफावत आहे. त्यासाठी अधिवेशनात आम्ही रोज येऊ. पण, ज्या पालघरात लोकं राहतात. तिथं रात्री झोपायला जाऊ. तिथून आम्ही अधिवेशनाला हजेरी लावू. ३० डिसेंबरपर्यंत पालीत राहून अधिवेशनाला हजेरी लावू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

किमान हा मुद्दा चव्हाट्यावर आला पाहिजे. याकडं लक्ष गेलं पाहिजे. जातिवाद संपला. पण, ग्रामीण आणि शहरी अशी तफावत सुरू झाली. तीन लाख रुपये उत्पन्नाचं सर्टिफिकेट मिळाल्यास शहरात घरं मिळते. गावात घरकुलासाठी मात्र २१ अटी कशासाठी, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.

जंगलाच्या शेजारी एक शेत निवडलं आहे. जे लोकं पाल टाकून राहतात त्यांच्यासोबत मी राहणार आहे. तिथून येणं-जाणं करून अधिवेशन करू. आंदोलन करणं म्हणजे विरोध करणं होत नाही. आंदोलन करणं म्हणजे लक्षवेध होय. एखादं लेकरू बोललं याचा अर्थ ते आईच्या विरोधात आहे, असं होत नाही. हजार लोकं पालीसह येणार आहेत. ते त्यांच्या कुटुंबांसोबत राहतील. उद्याचं अधिवेशन संपलं की, उद्याचा मुक्काम पालीत करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...