बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात करणार आंदोलन, जंगलाच्या शेजारील आंदोलन कसं असणार?

जंगलाच्या शेजारी एक शेत निवडलं आहे. जे लोकं पाल टाकून राहतात त्यांच्यासोबत मी राहणार आहे. तिथून येणं-जाणं करून अधिवेशन करू.

बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात करणार आंदोलन, जंगलाच्या शेजारील आंदोलन कसं असणार?
बच्चू कडू
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 8:15 PM

नागपूर : आमदार बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात आंदोलन करणार आहे. बच्चू कडू म्हणाले, स्वातंत्र्याला ७० वर्षे झालीत. अन्न, वस्त्र व निवारा असा घटनेचा सार होता. प्रत्येकाला अन्न मिळावं, वस्त्र मिळावं तसंच घर मिळावं असं अपेक्षित होतं. आमदार, खासदार, बिल्डर यांचे घर एक नाही दहा-दहा व्हायला लागलेत. सामान्य माणसाचं घरं जसच्या तसंच आहे. केंद्र सरकारनं २०२२ मध्ये सर्वांना घर अशी घोषणा केली. काही लोकं अजूनही मातीच्या घरातही राहू शकत नाही. वर्षानुवर्ष पालीत राहतात. कुठूनं पाणी येणार. आयुष्य कसं जाणार. इकडं स्टटी रुम असतं. तिकडं शिक्षण नाही. जेवढ्या आमच्या बाथरूमा असतात, तेवढं त्यांचं घर नसतं. ही तफावत आहे. यासाठी लक्ष वेधण्यात येणार आहे.

ही मागणी घेऊन हे आंदोलन राहणार आहे. शहरात पंतप्रधान आवास योजनेचे अडीच लाख रुपये मिळतात. दुसरीकडं गावात एक लाख १८ हजार रुपये मिळतात. एवढी तफावत आहे. त्यासाठी अधिवेशनात आम्ही रोज येऊ. पण, ज्या पालघरात लोकं राहतात. तिथं रात्री झोपायला जाऊ. तिथून आम्ही अधिवेशनाला हजेरी लावू. ३० डिसेंबरपर्यंत पालीत राहून अधिवेशनाला हजेरी लावू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

किमान हा मुद्दा चव्हाट्यावर आला पाहिजे. याकडं लक्ष गेलं पाहिजे. जातिवाद संपला. पण, ग्रामीण आणि शहरी अशी तफावत सुरू झाली. तीन लाख रुपये उत्पन्नाचं सर्टिफिकेट मिळाल्यास शहरात घरं मिळते. गावात घरकुलासाठी मात्र २१ अटी कशासाठी, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.

जंगलाच्या शेजारी एक शेत निवडलं आहे. जे लोकं पाल टाकून राहतात त्यांच्यासोबत मी राहणार आहे. तिथून येणं-जाणं करून अधिवेशन करू. आंदोलन करणं म्हणजे विरोध करणं होत नाही. आंदोलन करणं म्हणजे लक्षवेध होय. एखादं लेकरू बोललं याचा अर्थ ते आईच्या विरोधात आहे, असं होत नाही. हजार लोकं पालीसह येणार आहेत. ते त्यांच्या कुटुंबांसोबत राहतील. उद्याचं अधिवेशन संपलं की, उद्याचा मुक्काम पालीत करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.