AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाच्या हालचाली? ‘त्या’ 5 मंत्र्यांना खरंच डच्चू? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात…

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला पडद्यामागे काय घडामोडी घडत आहेत त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण एकीकडे कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपात मोठा वाद उफाळला आहे. वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतरही वाद शमताना दिसत नाहीय. तर दुसरीकडे शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना डच्चू दिला जाणारच्या चर्चांनी जोर धरला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाच्या हालचाली? 'त्या' 5 मंत्र्यांना खरंच डच्चू? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
Image Credit source: tv9
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 12, 2023 | 3:04 PM
Share

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वीच मोठा दावा केला होता. आगामी काळात शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं खडसे यांचं म्हणणं आहे. या पाच मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज आहेत. त्यामुळे या नेत्यांचा राजीनामा घेण्यास सांगितलं जाणार असल्याचा दावा खडसेंनी केला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील तसाच काहीसा दावा केला आहे. त्यांनी शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू दिला जाणार असल्याचा दावा केला. या दाव्यांव आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

“भारतीय जनता पक्षाचा मी 32 वर्षांपासून कार्यकर्ता आहे. भाजप पक्ष कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करेल, असं मला वाटत नाही. कुणाला मंत्री करायचं, कुणाला नाही ठेवायचं हे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत. त्यांच्या पक्षात कुणाला मंत्रीपदावरुन काढायचं हा त्यांचा अधिकार आहे. भाजप कधीच नाक खुपसत नाही. आम्ही त्यांना कशाला सल्ला द्यायचा? आमचं युतीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपचा कोण मंत्री व्हावं, कोण नाही हे भाजप ठरवेल, शिंदे त्यांच्या पक्षाचं ठरवतील”, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

‘आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी यासाठी…’

“हे चुकीचं नरेटिव्ह भाजपचं नाही. आमच्या आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये धास्ती वाढली पाहिजे, आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी यासाठी कुणीतरी ही गाजराची पुंगी सोडली आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

‘आळंदीच्या घटनेवर राजकारण नको’

आळंदीत जो काही प्रकार घडला त्यावरबी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की, याचं राजकारण करू नका. मला वाटतं यात आणखी काही नवीन गोष्टी बोलायची गरज नाही. मागच्या वेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी अशीच घटना झाली होती. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी राजकारण करावे. कारण फडणवीस यांनी काल घटनेबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे”, असं बावनकुळे म्हणाले.

“विरोधकांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षाही भयंकर घटना घडली होती. त्या ठिकाणी पुन्हा काही होऊ नये म्हणून काही सूचना आणि व्यवस्था उभ्या केल्या. सरकारकडून आवाहन करण्यात आलंय की, विरोधकांनी राजकारण करू नये”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...