AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शिंदे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री, फडणवीसच CM हवेत’ म्हणणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराचं थेट 6 वर्षांसाठी निलंबन

भाजपकडून माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी केली होती. तसेच त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारास सहकार्य करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर थेट 6 वर्षे निलंबनाची कारवाई केली आहे.

'शिंदे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री, फडणवीसच CM हवेत' म्हणणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराचं थेट 6 वर्षांसाठी निलंबन
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
| Updated on: Oct 15, 2024 | 8:03 PM
Share

भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर तब्बल 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे नव्हेत तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हवेत, असं वक्तव्य मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केलं होतं. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याकडून आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीलादेखील विरोध करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपकडून मल्लिकार्जुन रेड्डी यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आलं आहे. “आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी असताना पक्ष विरोधी कारवाया करत पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केलं आहे. आपली ही कृती पार्टीचा अनुशासन भंग करणारी असून आपल्याला 6 वर्षांकरता पक्षातून निलंबित करण्यात येत आहे”, असं पत्र मल्लिकार्जुन रेड्डी यांना पाठवण्यात आलं आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून मल्लिकार्जुन रेड्डी यांना निलंबनाचं पत्र पाठवण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकचे विद्यमान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विरोध केला होता. “एकनाथ शिंदे हे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता आम्हाला मुख्यमंत्री करायचं नाही. भाजपचा मुख्यमंत्री हवा. मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचं रामटेक मतदारसंघात काम करणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. मी महायुतीचा सन्मान करतो. मात्र आशिष जयस्वाल यांना विरोध आहे. नागपूर जिल्ह्यातून शिंदे गटाचा आमदार येऊ नये, अशी आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी आहे”, अशी भूमिका मल्लिकार्जून रेड्डी यांनी मांडली होती.

“महायुतीचे धर्मपालन कसे करणार? आशिष जयस्वाल यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मदत केली नाही. कार्यकर्त्यांना मानसन्मान नाही. निधी देत नाहीत. ते अपक्ष बंडखोर आमदार होते. विदर्भात न्याय मिळाला पाहिजे. 45 जागा निवडून आणण्याचा संकल्प केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. आम्ही आशिष जयस्वाल यांचे काम करणार नाही फाशी दिली तरी चालेल. उमेदवार बदलला पाहिजे, हे पक्षाचे वफादार नाहीत. भाजपने पुन्हा विचार करावा. माझ्याकडे काय आहे, काहीच नाही, आमच्यावर काय कारवाई करणार”, असं मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.