AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत एकमत, अधिवेशनानंतर होणार महामंडळ वाटप

काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेबदल किंवा मंत्री बदल करण्याबाबत हायकमांड निर्णय घेणार असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल हायकमांडच्या हातात आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची या अधिवेशनात निवड होणार असल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.

Nana Patole : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत एकमत, अधिवेशनानंतर होणार महामंडळ वाटप
Nana Patole
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 04, 2021 | 12:38 PM
Share

नागपूर : महामंडळ वाटपाची तयारी पूर्ण झालीय. येत्या हिवाळी अधिवेशनानंतर राज्यात महामंडळ वाटप होणार आहे. महाविकास आघाडीत महामंडळ वाटपावर तिन्ही पक्षात एकमत झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना आज सांगितलं.

अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षांची निवड

काँग्रेसमध्ये कुणाला मंत्री ठेवायचं की नाही याबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याचं पटोले म्हणाले. मी आघाडीत मंत्रीपद मागितलं नाही. काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेबदल किंवा मंत्री बदल करण्याबाबत हायकमांड निर्णय घेणार असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल हायकमांडच्या हातात आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची या अधिवेशनात निवड होणार असल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.

ममता बॅनर्जींवरील सामनातील टीका योग्य

आज देशात जी परिस्थिती आहे. त्यात देश विकणाऱ्यांसोबत राहायचं की, देश वाचवणाऱ्यांसोबत राहायचं हे राजकीय पक्षांनी ठरवायचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं. भाजप सरकारने देशाची तबाही केलीय. अशा वेळेस ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य देश विकणाऱ्यांची साथ देणारं होतं. आज सामनातून जी भूमिका मांडली ती देश हितासाठी मांडलीय. सरकार वाचवण्यासाठी नाही. सामनातून ममता बॅनर्जी यांच्यावर केलेली टीका योग्य असल्याचं मतही पटोले यांनी व्यक्त केलंय.

एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा

सेवा नियमानुसार एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. संपामुळे प्रवाशांचं मोठं नुकसान होतंय. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, ही काँग्रेसची भूमिका असल्याचं ते म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत काही लोक घोडेबाजार करतात. काही लोक विचाराने जिंकतात. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेला उमेदवार विचाराने निवडणूक लढत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर लोकांच्या हातात आहे. शेवटी लोकशाहीत लोकांच मत ज्याच्याकडं तो सत्ताधीश ठरतो, असंही पटोले म्हणाले.

Yavatmal Crime खुनानंतर दोन गटांत वाद, काळीदौलतमध्ये जमावबंदीचे आदेश, गावात पोलिसांचा फौजफाटा

Nagpur Deekshabhoomi सहा डिसेंबरला महापरिनिर्वाणदिन, दीक्षाभूमीवरील गर्दी टाळा, प्रशासनाचे आवाहन

Follow Us
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर