AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरी पंतप्रधान होणार? भाजपला किती खासदार कमी पडणार?; नाना पटोले यांचं भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट

राज्यात पाऊस नाही. दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारने दुष्काळाच्या परिस्थितीची उपाययोजना करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते मीडियाशी बोलत होते.

नितीन गडकरी पंतप्रधान होणार? भाजपला किती खासदार कमी पडणार?; नाना पटोले यांचं भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट
nana patoleImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 04, 2023 | 8:21 AM
Share

वर्धा | 4 सप्टेंबर 2023 : येत्या डिसेंबरमध्ये किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली हे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचं आव्हान पेलण्यासाठी भाजपला एनडीएचं पुनरुज्जीवन करावं लागलं आहे. गेल्या 9 वर्षापासून भाजपची केंद्रात स्वबळावर सत्ता असूनही भाजपला एनडीएला मजबूत करावं लागत असल्याने आश्चर्य वाटत आहे. भाजप स्वबळावर करिश्मा करू शकत नाही का? अशी चर्चाही या निमित्ताने होऊ लागली आहे. त्याला कारण म्हणजे अनेक सर्व्हेंमध्ये भाजपचं बळ घटताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी राहणार की नाही? अशी चर्चाही सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल वर्धा येथे होते. वर्ध्यातील आर्वीत काँग्रेसची जनसंवाद यात्रा पोहोचली. यावेळी त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत महत्त्वाची माहिती दिली आहे. भाजपने सर्व्हे केला आहे. त्यात त्यांना 50 खासदार कमी पडताना दिसत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची संधी वाढल्याने नितीन गडरी उभे राहिले आहेत. आता गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भांडणं सुरू झाली आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपचा आकडा कमी होईल

नाना पटोले यांनी भाजपमधील अंतर्गत वादाची माहिती देतानाच नितीन गडकरींबाबतचं निरीक्षणही नोंदवलं आहे. पूर्वी गडकरी काय बोलायचे आणि आता काय बोलत आहेत, हे बारकाईने पाहा. पूर्वी गडकरी म्हणायचे तलावात विमान उतरवेल, हवेत बस उडवेन… गडकरी यांच्या अशाच घोषणा होत्या. पण आता संधी दिसताच गडकरी उभे झाले आहेत. 50 खासदार कमी पडले तर मी प्रधानमंत्री बनेल, असं बोलणं सुरू झालंय. त्यामुळे मोदी आणि गडकरी यांचा वाद सुरू झालाय. डिसेंबरमध्ये सर्व्हे होईल तेव्हा भाजपचा आकडा पुन्हा खाली येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला.

पिंजरा तोडून आलो

आता मशिनबिशिन काही कामी येणार नाही. आपल्या मतविभाजनामुळे आपण हरलो होतो, असंही त्यांनी सांगितलं. लोकशाहीची थट्टा चालवली आहे. केचे यांची गरज संपली. केचे यांना संधी नाही. मी होतो थोडे दिवस तिकडे त्यामुळे मला माहिती आहे. मी त्यांचा पिंजरा तोडून पळून आलो. ताट वाजवू नको, नाही तर दरिद्री येते, असं आई सांगते. यांनी देशाला ताट वाजवायला लावले आणि दरिद्री आली, अशीही टीकाही त्यांनी केली.

मुलाबाळांना मारणारं सरकार

जालन्यात जो लाठीचार्ज झाला तो अमानुष होता. पेटलेला वणवा सरकारने थांबवला पाहिजे नाही तर जनता वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने माफी मागितली पाहिजे. राज्यात दुष्काळचे परिस्थिती आहे आणि सरकार शासन आपल्या दारी माध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. स्वत;च्या हाताने आपली पाठ थोपटत आहे. हे सरकार मायबाप सरकार नाही हे तर आपल्या मुलाबाळांना मारणार सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं