AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शरद पवार आमचा विठ्ठल’, अमोल मिटकरींच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

'शरद पवार आमचा विठ्ठल', अमोल मिटकरींच्या 'त्या' विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...
| Updated on: Dec 27, 2022 | 7:19 PM
Share

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन निशाणा साधला. “अमोल मिटकरी बोलले की, शरद पवार आमचा विठ्ठल आहे. ते चांगल्या हेतूने बोलले असतील. शरद पवार मोठेच नेते आहेत. पण देवाशी तुलना होऊ शकते का?” असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला.

“छत्रपती उदयनराजे यांना ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत का याचे पुरावे मागणारे लोकसुद्धा आपल्याकडे आहेत. हा छत्रपती घराण्याचा अपमान नाहीय का? आपण आज ज्यावेळी असं बोलतो की, हो आमच्यावर अफजल खानाच्या फौजा पाठवा. म्हणजे तुम्ही स्वत:ला छत्रपती समजता? तुम्ही स्वत:ला छत्रपती समजून अशाप्रकारे बोलता?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला.

“ठाकरे गटाच्या नेत्या म्हणाल्या, संजय राऊतांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत. त्यांनी शिवबांसारखा हिरा जन्माला घातला. आपण कुणाशी तुलना करतोय? सगळ्याच माता महान असतात. कुठल्याच मातेचा अपमान नाही. पण ही तुलना होऊ शकते काय?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“रेड्याला शिकवण्याचं सामर्थ्य आहे म्हणून संतांचा चमत्कार म्हणतात तर सामान्य माणसांना का शिकवलं नाही? असं म्हणत नामदेव महाराजांचा अपमान करत कुत्र्याचा दूध देतात पण माणसाला देत नाही, अशा प्रकारचे जे वक्तव्य समोर आले आहेत त्यांचा निषेध आपण केला का? नाही केला”, असं फडणवीस म्हणाले.

“ज्या वारकरी संप्रदायाने जात विरहीत एक वारकरी समाज निर्माण केला ज्यामध्ये संत चोखोबा आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली देखील आहेत. दोन्ही संतांची जात कुणी विचारत नाही. जगदगुरु तुकराम महाराजांचा विचार समाजापर्यंत पोहोचवणारे वेगवेगळ्या समाजाचे लोकं आहेत. संताजी महाराज ज्यांनी तुकोबांच्या गाथा वाचवल्या ते काही तुकोबांच्या समाजाचे नाहीत. ज्यांनी गाथा वाचवली ते तुकोबांच्या समाजाचे नव्हते. पण आज त्यांनाही समाजात विभाजित केलं जातं आणि त्याबद्दल कुणीही बोलत नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...